१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही देणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : कोरोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता देशात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावर्षी जानेवारीपासून १५ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. येत्या बुधवारपासून म्हणजे १६ मार्चपासून १५ वर्षांखालील मुलांनाही कोरोनाची लस दिली जाईल, असे ते म्हणाले.


केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवी यांनी यासंदर्भात ट्विट केले. ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाईल. 'मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो', असे मांडवीय म्हणाले. आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स लसीचा डोस दिला जाईल.


देशात ३ जानेवारी २०२२ पासून देशात प्रथमच १८ वर्षांखालील मुलांना कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरू झाली. तेव्हापासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना ही लस दिली जात आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या शाळा उघडणे सोपे झाले. आता १२ वर्षांच्या मुलांचेही लसीकरण करून लहान मुलांना शाळेत पाठवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. २००८, २००९ किंवा २०१० मध्ये जन्मलेल्या मुलांचे लसीकरण केले जाईल. देशातील १८ वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध असलेली ही चौथी कोरोनावरील लस असेल.


भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल (डीजीसीआय) ने २१ फेब्रुवारीला बायोलॉजिकल-ई ची कोरोनावरील लस 'कोर्बेवॅक्स'ला काही अटींसह आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. ही लस १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी मंजूर करण्यात आली. डीजीसीआयने १२ वर्षांवरील मुलांसाठी सर्व प्रथम 'झायकोव-डी' या लसीला मंजुरी दिली. भारतीय औषध नियामकाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोवोव्हॅक्स या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. कोरोनावरील विषय तज्ज्ञ समितीच्या शिफारशीच्या आधारावर डीजीसीआयने कोवोव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च