१२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनाही देणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : कोरोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता देशात १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावर्षी जानेवारीपासून १५ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. येत्या बुधवारपासून म्हणजे १६ मार्चपासून १५ वर्षांखालील मुलांनाही कोरोनाची लस दिली जाईल, असे ते म्हणाले.


केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवी यांनी यासंदर्भात ट्विट केले. ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाईल. 'मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो', असे मांडवीय म्हणाले. आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कॉर्बेव्हॅक्स लसीचा डोस दिला जाईल.


देशात ३ जानेवारी २०२२ पासून देशात प्रथमच १८ वर्षांखालील मुलांना कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरू झाली. तेव्हापासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना ही लस दिली जात आहे. त्यामुळे मोठ्या मुलांच्या शाळा उघडणे सोपे झाले. आता १२ वर्षांच्या मुलांचेही लसीकरण करून लहान मुलांना शाळेत पाठवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. २००८, २००९ किंवा २०१० मध्ये जन्मलेल्या मुलांचे लसीकरण केले जाईल. देशातील १८ वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध असलेली ही चौथी कोरोनावरील लस असेल.


भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल (डीजीसीआय) ने २१ फेब्रुवारीला बायोलॉजिकल-ई ची कोरोनावरील लस 'कोर्बेवॅक्स'ला काही अटींसह आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. ही लस १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी मंजूर करण्यात आली. डीजीसीआयने १२ वर्षांवरील मुलांसाठी सर्व प्रथम 'झायकोव-डी' या लसीला मंजुरी दिली. भारतीय औषध नियामकाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोवोव्हॅक्स या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. कोरोनावरील विषय तज्ज्ञ समितीच्या शिफारशीच्या आधारावर डीजीसीआयने कोवोव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती.

Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी