मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून चौकशी

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे यांची सीबीआयने जवळपास सहा तास चौकशी केली. यात त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते.


सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून जवळपास सहा तास चौकशी करण्यात आली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे. त्या प्रकरणात पांडे यांची चौकशी करण्यात आल्याचे कळते. याबाबत अधिकाऱ्यांनी शनिवारी माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप आहे. त्यासंबंधी ही चौकशी करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना या प्रकरणात प्रभावित केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात कथितरित्या गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी विविध कलमान्वये आणि भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.


मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासंबंधी आरोप केले होते. देशमुख यांनी कथितरित्या मुंबई पोलीस विभागातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे याला मुंबईच्या बार आणि रेस्तराँमधून एका महिन्यात १०० कोटी रुपयांहून अधिक वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप त्यांनी केला होता. प्राथमिक चौकशीत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर व्यक्तींनी चुकीच्या पद्धतीने आणि भ्रष्टाचाराच्या मार्गातून लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दिसून येत असल्याचा आरोप सीबीआयकडे दाखल एफआयआरमध्ये करण्यात आलेला आहे.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र