Share

देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभा सभागृह सुरू होताच विरोधकांनी ओबीसी आरक्षणावरून गदारोळ सुरू केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रत्युत्तर देत ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्यासाठी भाजपा आणि मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यावरून सभागृहात गोंधळ झाला.

ओबीसी आरक्षणावरून एकमेकांवर चिखलफेक करण्याऐवजी एकत्र बसून आपण या समस्येवर तोडगा काढू. ओबीसीबाबतीत सर्व पक्षातील लोकं एकत्र आहेत. हे देशाला आपण दाखवून देऊया. ओबीसी समाज वाचावा ही सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका आहे. आरोप-प्रत्यारोप, राजकारण होत राहिल, परंतु याने हा प्रश्न सुटणार आहे का? कायदेशीर बाबी तपासून हा प्रश्न सोडवूया. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केले.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, २०१० मध्ये ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सुरुवात झाली. २०१६ मध्ये हा डेटा समोर आला. परंतु केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार असताना गेली ७ वर्ष तुम्ही गप्प का? ओबीसी आरक्षणाबाबत भाजपा राजकारण करत आहे. ही चुकीची गोष्ट आहे. युपीए सरकारने तयार केलेला डेटा तुम्ही पुढे का आणला नाही? निवडणुका आल्यानंतर यावर राजकारण केले जात आहे. ओबीसी आरक्षणाची जबाबदारी मोदी सरकारवर आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यावर देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिले. ओबीसी आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही बैठकीला येतो. परंतु बैठकीत जे ठरवले जाते ते पुढे का जात नाही? वैयक्तिक तुमचा आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु मंत्री म्हणून तुम्हाला सरकारचा पाठिंबा आहे का? सरकार ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देतंय का? ओबीसी आरक्षणावरून आमच्याकडे बोट दाखवू नका. ओबीसी आरक्षणाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला ही जबाबदारी राज्य सरकारला घ्यावीच लागेल. ओबीसी आरक्षणाबाबत केवळ आश्वासने मिळतात त्यावर काहीच होत नाही. त्यामुळे सभागृहात ओबीसी आरक्षणावर चर्चा व्हायला हवी अशी मागणी फडणवीसांनी केली. दरम्यान, ओबीसींचे राजकीय आरक्षण सरकारच्या अपयशामुळे पूर्णपणे संपलेले आहे. राजकीय मागासलेपणाचा उल्लेख अहवालात कुठेच नव्हता. कोर्टात नवीन कुठलीही माहिती आणि रिसर्च करून डेटा राज्याच्या महाविकासआघाडी सरकारने पुरवला नाही, असेही फडणवीसांनी म्हटले.

फडणवीसजी आपण एकत्र बसून काम करूया – छगन भुजबळ

न्यायालयात खटला सुरू असताना फडणवीस, तुम्ही मुख्यमंत्री होते. तुम्ही काहीही केले नाही. आम्हाला १५ दिवसांत करायला सांगताय. तुम्ही फक्त राजकारण करत आहात. युपीए सरकारने तयार केलेला इम्पिरिकल डेटा तुम्ही दिला नाही. तुमचे सरकार होते तेव्हा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही पाच वर्ष ओबीसी आरक्षणासाठी काहीही केले नाही, असे सवाल छगन भुजबळ यांनी फडणवीसांना विचारले.

ओबीसीच्या पाठिमागे आपण उभे आहात ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळेच ओबीसींना वाचवा अशी टोपी मी घातली आहे. आमच्याकडे जे काही उपलब्ध होतं ते आम्ही १५ दिवसांत दिल्या. तुम्ही ७ वर्षांत ओबीसी आरक्षण का वाचवलं नाही? विकास गवळी कोणामुळे उभे राहतात? असे म्हणत छगन भुजबळ आक्रमक झाले. एकमेकांची उणी-धुणी काढण्यापेक्षा आपण चर्चा करू. चिखलपेक्षा करण्यापेक्षा आपण चर्चा करू. फडणवीसजी आपण एकत्र बसून काम करूया, असे छगन भुजबळ म्हणाले.

ओबीसी आरक्षणाबाबत बील सोमवारी विधानसभेत सादर करणार – अजित पवार

डेटा गोळा करण्यासाठी काही नियम असतात. कोणीही डेटा गोळा करू शकत नाही. आम्ही सर्व प्रयत्न केलेत. पण, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल द्यायचा तो दिला. आज पुन्हा आम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेत आहोत. मध्य प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार एक बिल आणण्याबाबत चर्चा केली जाईल. हे बील सोमवारी सभागृहात मांडणार आहोत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला कळवले जाईल. तसेच आमच्यावर कोणाचा दबाव नाही. आम्ही कोणाच्या दबावाला भीक घालत नाही, असा टोला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

Recent Posts

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…

13 minutes ago

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…

36 minutes ago

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…

1 hour ago

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…

2 hours ago

अतिरेक्यांशी झुंजताना दोन महिन्यांत सहा जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…

3 hours ago

Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला दिलेल्या आमंत्रणावरून नीरज चोप्रा वादाच्या भोवऱ्यात

ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू  : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…

3 hours ago