'एनएसई' घोटाळ्यातील आनंद सुब्रमण्यम ६ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत

मुंबई : 'एनएसई' को-लोकेशन प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेल्या आनंद सुब्रमण्यम यांना ६ मार्च २०२२ पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. 'एनएसई' को-लोकेशन घोटाळ, चित्रा रामकृष्ण आणि अज्ञात योगी प्रकरणी सुमब्रमण्यम यांची चौकशी होणार असून यात अनेक रहस्यमय खुलासे होण्याची शक्यता आहे.


चित्रा रामकृष्ण आणि अज्ञात योगी प्रकारणानंतर आनंद सुब्रमण्यम तपास यंत्रणांच्या रडारवर होते. गुरुवारी रात्री त्यांना सीबीआयने अटक केली. शुक्रवारी दिल्लीतील एका न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने सुब्रमण्यम यांना ६ मार्च २०२२ पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.


सुब्रमण्यम १ एप्रिल २०१३ रोजी एनएसईमध्ये मुख्य सल्लागार म्हणून रुजू झाले होते. २०१५ मध्ये ते एनएसईचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर झाले आणि एनएसईच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार म्हणून बढती देण्यात आली. २१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत ते या पदावर होते.


दरम्यान, आनंद सुब्रमण्यम यांना वित्तीय सेवा क्षेत्रातील कोणताही अनुभव नसताना त्यांना अशा पदावर नियुक्त केल्याबाबत भांडवली बाजार नियंत्रक सेबीने प्रश्न उपस्थित केला होता. सुब्रमण्यम यांना केवळ बढतीच मिळाली नाही तर गलेलठ्ठ पॅकेज देखील देण्यात आले होते.


सेबीने केलेल्या चौकशीमध्ये सुब्रमण्यम यांच्याबरोबर सहा कन्सल्टन्टची देखील नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी सुब्रमण्यम यांना सर्वाधिक १.६८ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले होते. तर इतर कन्सल्टन्ट यांना प्रत्येकी १२ ते ३८ लाखांचे पॅकेज देण्यात आले होते.


'एनएसई' को-लोकेशन प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात सुब्रमण्यम यांचाच मुख्य हात असल्याचा सीबीआयला संशय आहे. मात्र गेल्या आठवड्यात चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यम यांना सेबीने दंड ठोठावतल्या नंतर हा संशय आणखी बळावला. सुब्रमण्यम यांच्याकडून रामकृष्ण यांचे ई-मेल आणि अज्ञात योगीशी झालेल्या विशिष्ट भाषेतील संवादाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. सेबीने चित्रा रामकृष्ण यांना ३ कोटी रुपयांचा तर आनंद सुब्रमण्यम यांना २ कोटींचा दंड ठोठावला होता.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च