रशिया-युक्रेन युद्धाचे सावट! सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला

मुंबई : युक्रेन-रशिया यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह ५६,४३८.६४ अंकावर उघडला. काल बाजार ५७,६८३.५९ अंकावर बंद झाला होता. यानंतर सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला होता. सध्या, निफ्टी २३४.१० अंकासह १६,९७२.५५ च्या पातळीच्या आसपास दिसत आहे. त्याचवेळी, सेन्सेक्स १००१.६१ टक्क्यांनी घसरून ५६,६८१.९८ च्या पातळीवर आहे.


रशिया-युक्रेन संकट अधिक गडद झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेतील वातावरण खराब झाले आहे. आशिया, युरोपपासून रशियापर्यंतच्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सिंगापूर एक्सचेंज लिमिटेडमध्ये निफ्टी १७५ अंकांनी घसरला आहे. तर डाऊ फ्युचर्स सुद्धा ५०० अंकांच्या आसपास खाली आहे.


रशिया आणि युक्रेन यांच्यात निर्माण झालेल्या युद्ध सदृष्य परिस्थितीत, रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क आणि लुगांस्कला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केल्यानंतर युरोपियन युनियन, नाटो तसेच अमेरिका-यूकेसह अनेक देशांनी निषेध नोंदवला असून युक्रेनच्या मुद्द्यावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचीही बैठक होणार आहे. या बैठकीत रशियावर नवीन निर्बंध लादण्याची शक्यता आहे.


रशियाने दोन फुटीरतावादी प्रांतांना मान्यता दिली आहे. त्याचवेळी रशियाकडून युक्रेनवर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. या राजकीय तणावामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. भारतीय शेअर बाजारात निफ्टीवरील आयटी निर्देशांक दोन टक्क्यांनी घसरला आहे, तर बँक आणि वित्तीय निर्देशांक १ ते १.५ टक्क्यांनी घसरला आहे. ऑटो, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरूण खाली आले आहेत. दरम्यान, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ५ लाख कोटींहून अधिक खाली आले आहे.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे