कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घ्या आणि लागू केलेले निर्बंध शिथिल करा

नवी दिल्ली : करोनाची तिसरी लाट आता ओसरत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यानंतर सर्व राज्यांनीही करोना निर्बंध शिथिल करण्यास सुरवात केली आहे. आता याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.


राज्यांनी करोनाच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यास ते सुरवात शकतात. कारण आता देशातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहेत, असे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे. मंत्रालयाच्या या पत्रात करोनाची आकडेवारीही देण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात एकूण ३०,६१५ रुग्ण समोर आले आहेत. तर गेल्या आठवड्यात हा आकडा ५० हजारांच्या पुढे होता. त्याच वेळी पॉझिटिव्हिटी दर देखील १५ फेब्रुवारीला ३.६३ टक्क्यांपर्यंत खाली आला, असे केंद्राने पत्रात म्हटले आहे.


पण करोनाच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवा. दररोज आढळून येणारे नवीन रुग्ण आणि संसर्गाचे प्रमाण यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, लसीकरण आणि करोनाचे सर्व नियम पाळले पाहिजेत, असेही केंद्र सरकारने पत्रात स्पष्ट केले आहे.


दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ६१५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या मंगळवारच्या तुलनेत ११ टक्क्यांनी अधिक आहे. देशात गेल्या २४ तासांत ८२ हजार जण करोनातून बरे झाले आहे. तर ५१४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात अजूनही ३ लाख ७० हजार २४० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील करोना रुग्णांचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा २.४५ टक्के इतका आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे