सिंगल यूज प्लास्टिकच्या ‘या’ वस्तूंवर बंदी

Share

नवी दिल्ली : सिंगल यूज प्लास्टिक पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. या प्लास्टिक उत्पादनांमुळे पर्यावरणाची दीर्घ हानी होते. हे नुकसान लक्षात घेत ऑगस्ट २०२१ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी त्यावर बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होती. त्यात, १ जुलैपासून अशा सर्व वस्तूंवर बंदी घालण्यास सांगितले गेले होते. याच पार्श्वभूमीवर यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) नोटीस जारी केली आहे. ३० जूनपर्यंत या वस्तूंवर बंदी घालण्याची सर्व तयारी पूर्ण करावी, असे यात सांगण्यात आले आहे.

यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकच्या चमच्यांपासून ते इअरबड्सपर्यंत अनेक वस्तूंवर १ जुलैपासून बंदी घालण्यात येणार आहे.

सीपीसीबीच्या नोटिशीनुसार, १ जुलैपासून प्लास्टिक स्टिक असलेल्या इअरबड, फुग्याला असलेली प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक, आईसक्रिम स्टिक, सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकोल, आदिंचा समावेश आहे. याच बरोबर प्लास्टिक कप, प्लेट, ग्लास, काटा, चमचे, चाकू, स्ट्रॉ आणि ट्रे सारख्या कटलेरी वस्तू, मिठाईचे डिब्ब्यांवर लावले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिकच्या आमंत्रण पत्रिका, 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेले पीव्हीसी बॅनर आदींचाही यात समावेश असेल.

महत्वाचे म्हणजे, सीपीसीबीने जारी केलेल्या या नोटिशीत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यात उत्पादन जप्त करणे, पर्यावरणाची हानी केल्याबद्दल दंड आकारणे, तसेच, त्यांच्या उत्पादनाशी संबंधित उद्योग बंद करण्यासारख्या कारवाईचा समावेश आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

60 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago