अनुसूचित जाती आयोगाकडून मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुंबई : केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राद्वारे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती, असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. मात्र समीर वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी एका खटल्याची सुनावणी करताना आयोगाने वानखेडे यांच्या तक्रारीनुसार मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. तसेच समीर वानखेडे उपलब्ध कागदपत्रांनुसार अनुसूचित जातीचे आहेत, असे म्हटले आहे.


याआधी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत, ते महार समाजाचे नाहीत. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती, असा आरोप केला होता.


त्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून आयोगाने मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे. आयपीसी आणि एससी-एसटी कायद्याच्या कलम १८६, २११, ४९९, ५०३, ५०८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून आयोगाने गृह मंत्रालयाचे सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना नोटिसा पाठवल्या होत्या, पण त्यापैकी कोणीही आयोगासमोर हजर झाले नाही.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

BMC : मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मुंबई : जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून गौरवणार; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबई: वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर प्रभावी

मुंबईतील फोर्ट परिसरात आग; बाबेल हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर...

मुंबई: मुंबईतील फोर्ट परिसरात आग लागली. ही आग ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांवर लागली. तसेच ती हॉटेल इमारतीच्या

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या