भारतात असतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाट्याला आले नसते

बंगळूरू (वृत्तसंस्था): भारतात असतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाट्याला आले नसते, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डेविलियर्सने इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पॉडकास्टमध्ये बोलताना व्यक्त केले.


माझा जन्म भारतात झाला असता तर कदाचित राष्ट्रीय संघात जागा मिळवू शकलो नसतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे माझं स्वप्नच राहिले असते, असं डिव्हिलियर्स म्हणतो. भारतीय संघात आपली जागा निर्माण करणं सोपी गोष्ट नसून यासाठी भारतीय खेळाडूंचा आदर केला पाहिजे असंही मत त्याने मांडलं आहे. भारतीय क्रिकेट संघात एखाद्या खेळाडूला आपलं स्थान निर्माण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात राष्ट्रीय संघात जागा मिळवणं खूप मोठं आव्हानच आहे, असे एबीने म्हटले आहे.


गेल्या १५ वर्षांमध्ये आयपीएल क्रिकेट, भारतीय प्रेक्षक आणि भारतीय लोकांच्या काम करण्याची पद्धतीचा मी अनुभव घेतला आहे. भारतात जन्म होणं आणि मोठं होणं थोडं मजेशीर आहे. कोणाला माहित, मी भारतात जन्मलो असतो तर कदाचित राष्ट्रीय संघाकडून खेळू शकलो नसतो. भारतीय संघात सामील होणं खूपच आव्हानात्मक आहे. त्यासाठी तुम्हाला विशेष खेळाडू असावं लागेल, असे डेविलियर्स म्हणाले.


२००८ पासून खेळतोय आयपीएल


एबी डेविलियर्सने आतापर्यंत १८४ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३९.७० च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरनंतर सर्वाधिक धावा करणारा डेविलियर्स हा दुसरा परदेशी क्रिकेटपटू आहे. डेविलियर्स आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजेच २००८ पासून आयपीएलमध्ये बंगळूरू रॉयल चॅलेंजर्समध्ये (आरसीबी) खेळत आहे. यंदा आरसीबीने त्याला रिलीज केले. पुढील हंगामात डेविलियर्स नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये डेविलियर्स एकमेव परदेशी क्रिकेटपटू आहे.

Comments
Add Comment

कॅप्टन सूर्या चौथ्या सामन्यात मोठा निर्णय घेणार ? उपकर्णधार शुभमन गिलची जागा धोक्यात!

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेचा चौथा सामना गुरुवारी, ६ नोव्हेंबर रोजी

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये निर्णायक सामना, टीम इंडिया सामन्यासाठी सज्ज

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ५ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर मात करत तिसऱ्या टी

द. आफ्रिकेविरुद्ध रोहित-विराट खेळणार नाही?

तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका; १३ नोव्हेंबरपासून सुरू मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघात

द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी 'शुभमन सेना' सज्ज; ऋषभ पंतचे पुनरागमन निश्चित

मुंबई : भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने दक्षिण

मिचेल सँटनर, जेकब डफीची विक्रमी भागीदारी

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. जिथे पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू झाली आहे.

Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि गर्लफ्रेंड माहिका शर्मा यांचा 'कार वॉश' रोमांस; किसिंग व्हिडीओने सोशल मीडियावर लावली आग!

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे.