'काळे धंदे समोर येतील म्हणून राऊत घाबरले'



मुंबई : संजय राऊत हे कालपर्यंत नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपच्या अगदी लहान कार्यकर्त्यावरही टीका करत होते. मग आता 'ईडीच्या' चौकशीची वेळ आल्यावर संजय राऊत कशाला घाबरत आहेत?, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. 'ईडी'च्या कारवाईमुळे सगळे काळे धंदे समोर येतील म्हणून संजय राऊत खूप घाबरले आहेत. पण कर नाही त्याला डर कशाला? त्यामुळे संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊन सर्व खुलासा करावा. यापूर्वी ईडीने त्यांच्या पत्नीचीही चौकशी केली होती. त्यामध्ये काही निष्पन्न झाले नव्हते. एरवीही संजय राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ, असे सातत्याने बोलत असतात. मग आताच काय झाले, असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


तसेच संजय राऊत यांना केंद्रीय तपासयंत्रणा चुकीच्या वाटत असतील तर त्यांनी न्यायालयात जाऊन दाद मागावी. पण बेलगाम आरोप करु नयेत. परंतु, न्यायालयात गेल्यानंतर संजय राऊतांचे सगळे काळे धंदे दोन मिनिटांत समोर येतील. त्यामुळे संजय राऊत यांनी फुशारक्या मारु नयेत. जे असेल ते न्यायालयात जाऊन सांगावे. संजय राऊत यांनी आपणहून आपल्या कृत्यांची माहिती ईडीला द्यावी. मग इतरांना त्यांचे धंदे उघडकीस आणण्याची वेळ येणार नाही, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले. तसेच स्वत:वर कारवाई होते तेव्हा प्रत्येकालाच आणीबाणी वाटते, असेही भातखळकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींना धक्का; केवायसी न केलेल्या आणि नियमांचे उल्लंघन केलेल्या महिला योजनेतून बाद

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'

Santosh Nalawade : वापरा आणि फेकून द्या...मनसेच्या शिवडी अध्यक्षांनी का दिला राजीनामा? ५ मोठी कारणं आली समोर

मनसेच्या वटवृक्षाला नेत्यांनीच टोचलं विषारी इंजेक्शन? मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात

खुशखबर! लोकल आणि मेल एक्सप्रेससाठी मिळणार स्वतंत्र मार्ग; मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून आदेश जारी...

मुंबई : मुंबईतील रेल्वेचे जाळे हे वेगानं वाढत चाललं आहेत. त्यामुळे अनेक शहरे मुंबईला जोडली जात आहे. मुंबई

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण