इंदूरमध्ये उभारणार लता दीदींचा पुतळा

भोपाळ : भारतरत्न लता मंगेशकर यांचा मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या नावाने संगीत अकादमी देखील स्थापन केली जाणार आहे. याबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज घोषणा केली.


लता दीदींचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. त्यामुळे त्यांच्या नावाने इंदूरमध्ये संगीत अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संगीत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांच्या गाण्याचं शिक्षण दिलं जाईल. एक संग्रहालय तयार करून आम्ही त्यात लता दीदींच्या सर्व गाण्याचं संग्रह करणार आहोत, असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.


लता दीदी या फक्त संगीतापुरत्या मर्यादीत नव्हत्या. त्या एक सच्च्या देशभक्त होत्या. त्यांच्याकडून सर्वांना प्रेरणा मिळतेय. भावी पिढीला देखील ही प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, असंही सिंह म्हणाले. आज त्यांनी स्मार्ट सिटी पार्क येथे लता दीदींच्या स्मरणार्थ एक झाड लावले. यावेळी भोपाळमधील संगीत क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.


लतादीदींच्या निधनाने वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना करोडो भारतीयांची आहे. त्यांच्या गाण्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा संचारली आहे. लता दीदींच्या जाण्यामुळे माझ्या स्वतःच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी