कांदिवली स्थानकावरील सरकते जिने सुरू करण्याकरिता आ. अतुल भातखळकर यांचे आंदोलन

मुंबई : कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकावरील सरकते जिने सुरू करण्याकरिता मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिके विरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारावर कडाडून टीका केली.


गेल्या दोन वर्षांपासून कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकावरील सरकते जिने बंद असल्याबाबत आ. भातखळकर यांनी पत्राद्वारे महापालिकेला कळविले होते. परिसरातील नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर सरकते जिने सुरू करण्याबाबत त्यांनी वारंवार महापालिकेला कळवून देखील पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी आज धरणे आंदोलन केले. यावेळी पालिका केवळ पेंग्विन पालनामध्ये व्यस्त असल्याने मुंबईकरांच्या इतर प्रश्नांची दखल घ्यायला वेळ नाही असे म्हणत आ. भातखळकर यांनी पालकमंत्र्यावर ही निशाणा साधला.


या आंदोलनात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व महिला तसेच कांदिवली विभागातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व कार्यकर्ते हे सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकावर प्रवाशांचा नवा तोडगा

लोकल उशिरा, तर ईमेलचा मारा मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन

विधानसभेत पुन्हा एकदा घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज

कोकणातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वेधले सरकारचे लक्ष मुंबई : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९