महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून यामुळे जमीन व्यवहार अधिक सोपे, पारदर्शक आणि वेगवान होणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयांची माहिती दिली आहे. सातबारा उतारे, मिळकत पत्रिका, भूमी नकाशे आणि भू-संदर्भीकरण यांसारख्या मूलभूत सेवा आता पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आल्या आहेत.


याआधी जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्यासाठी म्हणजेच फेरफार अर्जासाठी शेतकरी आणि नागरिकांना तहसील व महसूल कार्यालयांचे अनेक फेरे मारावे लागत होते. या प्रक्रियेमुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता. मात्र महसूल विभागाच्या आधुनिकीकरण धोरणाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ई-फेरफार प्रणालीमुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे.


ई-फेरफार पोर्टलच्या माध्यमातून नागरिक थेट अर्ज करू शकत असल्याने कार्यालयांमधील गर्दी कमी झाली आहे. मध्यस्थांची गरज संपल्याने भ्रष्टाचारालाही मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे. सध्या राज्यात दरमहा लाखो फेरफार व्यवहार ऑनलाईन होत असून महसूल यंत्रणेवरील ताण कमी होऊन कामकाजाला गती मिळाली आहे.


जमिनीची मोजणी, सीमारेषा आणि नकाशांवरून निर्माण होणारे वाद शेतकऱ्यांसाठी कायमची अडचण ठरत होते. मात्र डिजिटल मोजणी प्रणालीद्वारे तयार करण्यात आलेले ई-नकाशे आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे मोजणीतील चुका, गैरसमज आणि वाद मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. तसेच सातबारा उतारे, नमुना ८-अ, मालमत्ता पत्रक यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध झाल्याने बनावट व्यवहार, दुबार नोंदी आणि फसवणुकीला आळा बसला आहे. पारदर्शकता वाढल्यामुळे न्यायालयीन वादांची संख्याही घटत असल्याचं चित्र आहे.


महसूल विभागाकडून ई-चावडी आणि ई-मोजणी हे उपक्रमही वेगाने राबवले जात आहेत. याअंतर्गत गावागावातील जुने नकाशे स्कॅन करून त्यांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. भविष्यात सर्व जमीन व्यवहार पूर्णपणे डिजिटल, सुरक्षित आणि वादमुक्त करण्याचं उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवलं आहे.

Comments
Add Comment

Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग ( जी एम एल आर) प्रकल्प टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके

Bhandup : आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारतोय भांडुप संकुलात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या

BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती