महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून यामुळे जमीन व्यवहार अधिक सोपे, पारदर्शक आणि वेगवान होणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयांची माहिती दिली आहे. सातबारा उतारे, मिळकत पत्रिका, भूमी नकाशे आणि भू-संदर्भीकरण यांसारख्या मूलभूत सेवा आता पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आल्या आहेत.


याआधी जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्यासाठी म्हणजेच फेरफार अर्जासाठी शेतकरी आणि नागरिकांना तहसील व महसूल कार्यालयांचे अनेक फेरे मारावे लागत होते. या प्रक्रियेमुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता. मात्र महसूल विभागाच्या आधुनिकीकरण धोरणाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ई-फेरफार प्रणालीमुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे.


ई-फेरफार पोर्टलच्या माध्यमातून नागरिक थेट अर्ज करू शकत असल्याने कार्यालयांमधील गर्दी कमी झाली आहे. मध्यस्थांची गरज संपल्याने भ्रष्टाचारालाही मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे. सध्या राज्यात दरमहा लाखो फेरफार व्यवहार ऑनलाईन होत असून महसूल यंत्रणेवरील ताण कमी होऊन कामकाजाला गती मिळाली आहे.


जमिनीची मोजणी, सीमारेषा आणि नकाशांवरून निर्माण होणारे वाद शेतकऱ्यांसाठी कायमची अडचण ठरत होते. मात्र डिजिटल मोजणी प्रणालीद्वारे तयार करण्यात आलेले ई-नकाशे आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे मोजणीतील चुका, गैरसमज आणि वाद मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. तसेच सातबारा उतारे, नमुना ८-अ, मालमत्ता पत्रक यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध झाल्याने बनावट व्यवहार, दुबार नोंदी आणि फसवणुकीला आळा बसला आहे. पारदर्शकता वाढल्यामुळे न्यायालयीन वादांची संख्याही घटत असल्याचं चित्र आहे.


महसूल विभागाकडून ई-चावडी आणि ई-मोजणी हे उपक्रमही वेगाने राबवले जात आहेत. याअंतर्गत गावागावातील जुने नकाशे स्कॅन करून त्यांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. भविष्यात सर्व जमीन व्यवहार पूर्णपणे डिजिटल, सुरक्षित आणि वादमुक्त करण्याचं उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवलं आहे.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त