मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकावर प्रवाशांचा नवा तोडगा

लोकल उशिरा, तर ईमेलचा मारा


मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन बिघडते. अनेक प्रवासी कामाच्या ठिकाणी विलंबाने पोहोचल्याने त्यांच्या वेतनातून पगार कपात होण्याच्या घटना घडतात. तसेच अनेक रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे त्रासास तोंड द्यावे लागते. रेल्वेच्या अशा कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल करण्यास सुरुवात केली आहे.


मध्य रेल्वेवरील लोकल रोजच उशिरा धावतात. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. दररोज विलंबाने लोकल धावत असल्याने लोकलमधील गर्दी वाढते, पुढील प्रवासाच्या वेळा चुकतात. लोकल रखडल्याने किंवा उशीरा धावल्याने काही प्रवाशांच्या बाहेरगावच्या गाड्या, विमाने चुकल्याच्याही घटना घडल्या आहेत. प्रवासी वेळेत फलाटावर पोहोचून देखील विलंबाने धावत असलेल्या लोकलने प्रवास करावा लागतो. तसेच प्रवाशांना विलंबाबद्दल, लोकल रद्द झाल्याबाबत, लोकल बिघाडाबाबत अनेकदा माहितीही दिली जात नसल्याने प्रवाशांची परवड होते.


मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लोकलच्या ढासळणाऱया वक्तशीरपणाकडे लक्ष द्यावे. विलंबाच्या वेळी वेळेवर आणि स्पष्ट घोषणा कराव्यात. बिघाडाच्या घटना कमी होण्यासाठी सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ई-मेलद्वारे प्रवासी करत आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकासह इतर अधिकाऱ्यांच्या ई-मेलवर प्रवासी तक्रारींचे मेल
करत आहेत.


मध्य रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक


एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या आठ महिन्याच्या कालावधीत नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ढासळला. दर महिना सरासरी वक्तशीरपणा ९२ ते ९३ दरम्यान होता. परंतु, नोव्हेंबरमध्ये ९१.६८ टक्क्यांपर्यंत खाली आला. तसेच गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ९३.३८ टक्के सरासरी वक्तशीरपणा होता. त्यातुलनेत यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये १.७ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या बेशिस्त कारभाराबाबत संताप व्यक्त करत आहेत.


Comments
Add Comment

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया