मुंबई : मुंबईत कोरोनाचा (Corona) प्रार्दुभाव वाढला होता. तो आता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मात्र तरीही मुंबई महापालिकेने मुंबईत कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता शहरातील विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविड-19 प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्यांनी मुंबईतील विवाह नोंदणी सेवा (Marriage Registration Services) तात्पुरती थांबवली आहे. मुंबई पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई पालिकेने (BMC) यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये मुंबई पालिकेने म्हटले आहे की, मुंबईतील सध्याच्या COVID-19 परिस्थितीमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे विवाह नोंदणी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
पालिकेने नमूद केले आहे की, विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. मात्र नियोजित भेटीसह ही सेवा लवकरच पुन्हा सुरू केल्या जातील.
भेटीची तारीख आणि वेळ या सुविधेसह लवकरच सेवा पुन्हा सुरू केली जाईल. पुढे जाऊन बीएमसी व्हिडिओ केवायसी पर्यायाची तरतूद देखील शोधत आहे, असे बीएमसीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुंबईत सध्या ६० हजार ३७१ सक्रिय रुग्ण
काल मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी 7 हजार 895 वर पोहोचली आहे. मुंबईत शनिवारच्या तुलनेने रविवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत जवळपास तीन हजारांची घट झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय. मुंबईत काल दिवसभरात हजारो रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 11 रुग्णांचा काल दिवसभरात दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबईत काल दिवसभरात 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे मुंबईत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 9 लाख 20 हजार 387 इतकी आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर डबलिंग रेट हा 48 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोना संसर्गाचा ग्रोथ रेट हा 1.40 टक्के इतका आहे. तर सध्या 60 हजार 371 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…
फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…