उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

नागपूर : कारोनाची तिसरी लाट उसळलेली असून ती दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करीत आहे. राज्य सरकार आणि हाफकिन संस्थेने आता जागे व्हावे आणि सरकारी रुग्णालयांना आवश्यक असलेले साहित्य तातडीने पुरवावे. पुढील सात दिवसांत हा पुरवठा व्हायला हवा, अन्यथा स्पष्टीकरण देण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी व्यक्तिश: न्यायालयापुढे हजर व्हावे, अशा परखड शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) विविध युनिट्स आणि महत्त्वाच्या मशिन बंद आहेत. याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सरकारी रुग्णालयांकडे आवश्यक ते वैद्यकीय साहित्य पुरेशा प्रमाणात नाही. ही जबाबदारी हाफकिन संस्थेकडे असून त्यांनी हा पुरवठा केलेला नसल्याची माहिती गेल्या सुनावणी दरम्यान न्यायालय मित्र अॅड. अनूप गिल्डा यांनी सादर केली होती. त्यावर न्यायालयानेसुद्धा नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आज हाफनिक संस्थेने दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, विदर्भातील सर्व सरकारी रुग्णालयांना आवश्यकतेनुसार आईवी फ्लूईड वितरित करण्यात आले आहे.

मनुष्यबळाच्या कमतरेमुळे साहित्य पुरवठ्यात विलंब होत असल्याचे कारण हाफकिन संस्थेने दिले आहे. मात्र, ‘संस्थेकडून होणाऱ्या साहित्य पुरवठ्याचा विलंब हा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमतरतेचे कारण आता मान्य केले जाऊ शकत नाही,’ या शब्दात न्यायालयाने संस्थेला सुनावले.
Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध