रिक्षात विसरलेली बॅग मालकाला केली परत

शेखर भोसले


मुलुंडमध्ये रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात प्रवाशाने विसरलेली बॅग परत करत प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. हा प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या आनंद चंद्रकांत भोळे या रिक्षाचालकाचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

मुलुंड पूर्वेतील रिक्षा चालक आनंद चंद्रकांत भोळे यांच्या रिक्षात शुक्रवारी मुलुंड पश्चिम येथील तांबे नगर परिसरात राहणारे सत्यवान रावराणे हे त्यांच्या बँकेतील कामानिमित्त प्रवास करत होते. त्यांनी एक हँड बॅग सोबत घेतली होती व या बॅगेत बँकेचे पासबुक, मुदत ठेवीचे सर्टिफिकेट, ८० हजार रुपये रोख रक्कम व इतर सामान होते. त्यांचे गंतव्य ठिकाण येताच ते रिक्षातून उतरले परंतु उतरताना ते आपली बॅग रिक्षातच विसरले. रिक्षा थोडी पुढे आल्यावर रिक्षाचालक आनंद भोळे यांनी कामानिमित्त आपली रिक्षा एका ठिकाणी थांबवली असता त्यांना त्यांच्या रिक्षात ही बॅग दिसली. त्यांनी रिक्षातून उतरलेल्या बॅगेच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती व्यक्ती न दिसल्याने प्रामाणिक रिक्षा चालकाने मुलुंड पूर्वेतील स्टेशन जवळील शिवसेना शाखेत बॅग आणून दिली व घडलेली घटना कथन केली.

बॅग मालकाचे नाव आणि संपर्क क्रमांक बघण्यासाठी बॅगेतील कागदपत्रे बघितली असता सत्यवान रावराणे हे बॅग मालकाचे नाव असल्याचे आढळून आले तसेच आतील कागदपत्रांद्वारे त्यांचा मोबाईल नंबर देखील मिळाला.
Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील