रिक्षात विसरलेली बॅग मालकाला केली परत

शेखर भोसले


मुलुंडमध्ये रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात प्रवाशाने विसरलेली बॅग परत करत प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. हा प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या आनंद चंद्रकांत भोळे या रिक्षाचालकाचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

मुलुंड पूर्वेतील रिक्षा चालक आनंद चंद्रकांत भोळे यांच्या रिक्षात शुक्रवारी मुलुंड पश्चिम येथील तांबे नगर परिसरात राहणारे सत्यवान रावराणे हे त्यांच्या बँकेतील कामानिमित्त प्रवास करत होते. त्यांनी एक हँड बॅग सोबत घेतली होती व या बॅगेत बँकेचे पासबुक, मुदत ठेवीचे सर्टिफिकेट, ८० हजार रुपये रोख रक्कम व इतर सामान होते. त्यांचे गंतव्य ठिकाण येताच ते रिक्षातून उतरले परंतु उतरताना ते आपली बॅग रिक्षातच विसरले. रिक्षा थोडी पुढे आल्यावर रिक्षाचालक आनंद भोळे यांनी कामानिमित्त आपली रिक्षा एका ठिकाणी थांबवली असता त्यांना त्यांच्या रिक्षात ही बॅग दिसली. त्यांनी रिक्षातून उतरलेल्या बॅगेच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती व्यक्ती न दिसल्याने प्रामाणिक रिक्षा चालकाने मुलुंड पूर्वेतील स्टेशन जवळील शिवसेना शाखेत बॅग आणून दिली व घडलेली घटना कथन केली.

बॅग मालकाचे नाव आणि संपर्क क्रमांक बघण्यासाठी बॅगेतील कागदपत्रे बघितली असता सत्यवान रावराणे हे बॅग मालकाचे नाव असल्याचे आढळून आले तसेच आतील कागदपत्रांद्वारे त्यांचा मोबाईल नंबर देखील मिळाला.
Comments
Add Comment

भारत आणि इटली यांच्यातील सांस्कृतिक सेतूची उभारणी कारावाज्‍जो, रावबहादूर महादेव विश्‍वनाथ धुरंधर यांच्या चित्रप्रदर्शनातून

मुंबई (खास प्रतिनिधी) : कला आणि चित्रांच्या माध्यमातून प्रत्येक देशाची संस्कृती, सामाजिक जाणीव, इतिहास आणि

निवडणूक आयुक्त म्हणतात, मतदार यादीत बदल करणं 'आमचं कामच नाही'!

सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण मुंबई: स्थानिक स्वराज्य

सागरी विकासाची नवी दिशा! ‘इंडिया मेरीटाईम वीक’मुळे महाराष्ट्राला जागतिक ओळख

२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’चे आयोजन मुंबई : भारतीय सागरी क्षेत्राच्या

गोरेगाव गोकुळधामसह आसपासच्या परिसरात अपुरा पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरने मागण्याची आली वेळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव गोकुळधाम येथील भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची

स्वच्छ भारतात महाराष्ट्र अग्रस्थानी! – महिला गट, संस्था घेणार पुढाकार : मेघना बोर्डीकर

मुंबई : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग

मुंबई दिवाळीच्या सणापूर्वीच अधिक स्वच्छ राखण्यावर महापालिकेचा भर, बुधवारपासून असा घेतला हाती उपक्रम

मुंबई (खास प्रतिनिधी) : दिवाळीचा सण आला की आपण घरातील जळमटे काढून घरात स्वच्छता करतो, नको असलेल्या वस्तू फेकून देता