रिक्षात विसरलेली बॅग मालकाला केली परत

शेखर भोसले


मुलुंडमध्ये रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात प्रवाशाने विसरलेली बॅग परत करत प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. हा प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या आनंद चंद्रकांत भोळे या रिक्षाचालकाचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

मुलुंड पूर्वेतील रिक्षा चालक आनंद चंद्रकांत भोळे यांच्या रिक्षात शुक्रवारी मुलुंड पश्चिम येथील तांबे नगर परिसरात राहणारे सत्यवान रावराणे हे त्यांच्या बँकेतील कामानिमित्त प्रवास करत होते. त्यांनी एक हँड बॅग सोबत घेतली होती व या बॅगेत बँकेचे पासबुक, मुदत ठेवीचे सर्टिफिकेट, ८० हजार रुपये रोख रक्कम व इतर सामान होते. त्यांचे गंतव्य ठिकाण येताच ते रिक्षातून उतरले परंतु उतरताना ते आपली बॅग रिक्षातच विसरले. रिक्षा थोडी पुढे आल्यावर रिक्षाचालक आनंद भोळे यांनी कामानिमित्त आपली रिक्षा एका ठिकाणी थांबवली असता त्यांना त्यांच्या रिक्षात ही बॅग दिसली. त्यांनी रिक्षातून उतरलेल्या बॅगेच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती व्यक्ती न दिसल्याने प्रामाणिक रिक्षा चालकाने मुलुंड पूर्वेतील स्टेशन जवळील शिवसेना शाखेत बॅग आणून दिली व घडलेली घटना कथन केली.

बॅग मालकाचे नाव आणि संपर्क क्रमांक बघण्यासाठी बॅगेतील कागदपत्रे बघितली असता सत्यवान रावराणे हे बॅग मालकाचे नाव असल्याचे आढळून आले तसेच आतील कागदपत्रांद्वारे त्यांचा मोबाईल नंबर देखील मिळाला.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत