रिक्षात विसरलेली बॅग मालकाला केली परत

  103

शेखर भोसले


मुलुंडमध्ये रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षात प्रवाशाने विसरलेली बॅग परत करत प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. हा प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या आनंद चंद्रकांत भोळे या रिक्षाचालकाचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

मुलुंड पूर्वेतील रिक्षा चालक आनंद चंद्रकांत भोळे यांच्या रिक्षात शुक्रवारी मुलुंड पश्चिम येथील तांबे नगर परिसरात राहणारे सत्यवान रावराणे हे त्यांच्या बँकेतील कामानिमित्त प्रवास करत होते. त्यांनी एक हँड बॅग सोबत घेतली होती व या बॅगेत बँकेचे पासबुक, मुदत ठेवीचे सर्टिफिकेट, ८० हजार रुपये रोख रक्कम व इतर सामान होते. त्यांचे गंतव्य ठिकाण येताच ते रिक्षातून उतरले परंतु उतरताना ते आपली बॅग रिक्षातच विसरले. रिक्षा थोडी पुढे आल्यावर रिक्षाचालक आनंद भोळे यांनी कामानिमित्त आपली रिक्षा एका ठिकाणी थांबवली असता त्यांना त्यांच्या रिक्षात ही बॅग दिसली. त्यांनी रिक्षातून उतरलेल्या बॅगेच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती व्यक्ती न दिसल्याने प्रामाणिक रिक्षा चालकाने मुलुंड पूर्वेतील स्टेशन जवळील शिवसेना शाखेत बॅग आणून दिली व घडलेली घटना कथन केली.

बॅग मालकाचे नाव आणि संपर्क क्रमांक बघण्यासाठी बॅगेतील कागदपत्रे बघितली असता सत्यवान रावराणे हे बॅग मालकाचे नाव असल्याचे आढळून आले तसेच आतील कागदपत्रांद्वारे त्यांचा मोबाईल नंबर देखील मिळाला.
Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र