भाई संतोष जंगम यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

खालापूर (प्रतिनिधी) : खालापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ची निवडणूक १८ जानेवारी रोजी होत असून या एका वाॅर्डात शेतकरी कामगारपक्ष व शिवसेना यांच्यात लढत होत असून, शेकापचे उमेदवार भाई संतोष जंगम यांच्या विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे प्रभागात बोलले जात आहे.



खालापूर नगरपंचायतीच्या एका वाॅर्डात ही निवडणूक होत असून या प्रभागामधून शेतकरी कामगार पक्षाचे भाई संतोष जंगम व शिवसेनेचे मारुती पवार यांच्यात लढत होत आहे, या प्रभागावर संतोष जंगम यांचा नेहमीच वाढता प्रभाव राहिला आहे. येथील कोणत्याही कार्यक्रमात संतोष जंगम यांचा पुढाकार नेहमीच येथे राहिला आहे. लग्न समारंभ असो किंवा इतर कोणतेही काम असो संतोष जंगम हे मदतीला पुढेच सरसावताना दिसतात. त्यामुळे येथील जनतेच्या मनात जंगम यांच्याबद्दल वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. त्यामुळे संतोष जंगम यांना ही निवडणूक सोपी जाणार असल्याचे वाॅर्डात बोलले जात आहे.


मारुती पवार हे शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन जरी लढत असले तरी सेनेचा प्रभाव या प्रभागात कमी असल्याने सेनेला या वाॅर्डात धोका निर्माण होऊ शकतो. गेली दहा वर्षे जंगम या प्रभागाचे नेतृत्व करत असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहेत.सेनेकडून मंदा भोसले यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र छाननीच्या दिवशी त्यांचा अर्जच बाद झाल्याने मंदा भोसले यांच्या रूपाने जे सेनेकडून तगडे आव्ाहन होते ते संपुष्टातआले आहे.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि