भाई संतोष जंगम यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

खालापूर (प्रतिनिधी) : खालापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ची निवडणूक १८ जानेवारी रोजी होत असून या एका वाॅर्डात शेतकरी कामगारपक्ष व शिवसेना यांच्यात लढत होत असून, शेकापचे उमेदवार भाई संतोष जंगम यांच्या विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे प्रभागात बोलले जात आहे.



खालापूर नगरपंचायतीच्या एका वाॅर्डात ही निवडणूक होत असून या प्रभागामधून शेतकरी कामगार पक्षाचे भाई संतोष जंगम व शिवसेनेचे मारुती पवार यांच्यात लढत होत आहे, या प्रभागावर संतोष जंगम यांचा नेहमीच वाढता प्रभाव राहिला आहे. येथील कोणत्याही कार्यक्रमात संतोष जंगम यांचा पुढाकार नेहमीच येथे राहिला आहे. लग्न समारंभ असो किंवा इतर कोणतेही काम असो संतोष जंगम हे मदतीला पुढेच सरसावताना दिसतात. त्यामुळे येथील जनतेच्या मनात जंगम यांच्याबद्दल वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. त्यामुळे संतोष जंगम यांना ही निवडणूक सोपी जाणार असल्याचे वाॅर्डात बोलले जात आहे.


मारुती पवार हे शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन जरी लढत असले तरी सेनेचा प्रभाव या प्रभागात कमी असल्याने सेनेला या वाॅर्डात धोका निर्माण होऊ शकतो. गेली दहा वर्षे जंगम या प्रभागाचे नेतृत्व करत असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहेत.सेनेकडून मंदा भोसले यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र छाननीच्या दिवशी त्यांचा अर्जच बाद झाल्याने मंदा भोसले यांच्या रूपाने जे सेनेकडून तगडे आव्ाहन होते ते संपुष्टातआले आहे.

Comments
Add Comment

प्रचार सुरू असतानाच शिवसेना उमेदवारावर हल्ला

वांद्र्यातील घटनेने निवडणुकीत खळबळ मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील