भाई संतोष जंगम यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

खालापूर (प्रतिनिधी) : खालापूर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ची निवडणूक १८ जानेवारी रोजी होत असून या एका वाॅर्डात शेतकरी कामगारपक्ष व शिवसेना यांच्यात लढत होत असून, शेकापचे उमेदवार भाई संतोष जंगम यांच्या विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे प्रभागात बोलले जात आहे.



खालापूर नगरपंचायतीच्या एका वाॅर्डात ही निवडणूक होत असून या प्रभागामधून शेतकरी कामगार पक्षाचे भाई संतोष जंगम व शिवसेनेचे मारुती पवार यांच्यात लढत होत आहे, या प्रभागावर संतोष जंगम यांचा नेहमीच वाढता प्रभाव राहिला आहे. येथील कोणत्याही कार्यक्रमात संतोष जंगम यांचा पुढाकार नेहमीच येथे राहिला आहे. लग्न समारंभ असो किंवा इतर कोणतेही काम असो संतोष जंगम हे मदतीला पुढेच सरसावताना दिसतात. त्यामुळे येथील जनतेच्या मनात जंगम यांच्याबद्दल वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. त्यामुळे संतोष जंगम यांना ही निवडणूक सोपी जाणार असल्याचे वाॅर्डात बोलले जात आहे.


मारुती पवार हे शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन जरी लढत असले तरी सेनेचा प्रभाव या प्रभागात कमी असल्याने सेनेला या वाॅर्डात धोका निर्माण होऊ शकतो. गेली दहा वर्षे जंगम या प्रभागाचे नेतृत्व करत असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहेत.सेनेकडून मंदा भोसले यांचा देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र छाननीच्या दिवशी त्यांचा अर्जच बाद झाल्याने मंदा भोसले यांच्या रूपाने जे सेनेकडून तगडे आव्ाहन होते ते संपुष्टातआले आहे.

Comments
Add Comment

सहकारी गृहनिर्माण संस्थाना न्यायालयाचा दिलासा! आता खासगी विकासकाची निवड केल्यास 'एनओसी'ची गरज भासणार नाही

मुंबई: इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाविषयी अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांनी बहुमताने खासगी विकासकाची निवड

Monorail Accident : 'ट्रॅक सोडून बाहेर'! वडाळा स्थानकाजवळ मोनोरेलचा भीषण अपघात; पहिला डबा खांबांवरच अडकला, नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईच्या मोनोरेल सेवेला (Mumbai Monorail Service) लागलेले अपघातांचे ग्रहण काही सुटताना दिसत नाहीये. आज बुधवारी सकाळी

Eknath Shinde : 'गुवाहाटी' उठावाची खरी स्क्रिप्ट माझ्याकडेच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; 'पुस्तक लिहायचं तर मला विचारूनच लिहावं लागेल!'

मुंबई : शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी करून 'गुवाहाटी' (Guwahati) गाठण्याच्या आणि त्यानंतर सत्तेत परतण्याच्या घटनेमागील

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी ; ई-केवायसीची मुदत वाढवली

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. योजनेचा

किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून चार टक्के व्याज सवलत

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यास यश मुंबई  : महाराष्ट्रातील मच्छीमार व मत्स्यव्यवसायाशी

विमान तिकीट रद्द केल्यास २१ दिवसात पैसे परत मिळणार

मुंबई : महागडी विमान तिकिटे काढून ऐनवेळी ती रद्द करण्याची वेळ आली तर त्यावर बसणार भुर्दंड आणि पैसे परत