अंजप येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

  603

नरेश कोळंबे


कर्जत : आता सर्वच ठिकाणी कोरोनाने हाहाकार माजविला असून अनेक लोक पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने तपासणी आणि कोरोना टेस्ट करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. गाव - खेड्यांत अनेक वृद्ध स्त्री आणि पुरुष कधीही आजारपणाची तपासणी करून घेत नाहीत. अशा सर्वांना घरपोच सर्व सोय व्हावी यासाठी समतावादी प्रतिष्ठान आणि जय भवानी मित्र मंडळ अंजप यांच्या वतीने रायगड हॉस्पिटलमधील तज्ज्ञांना घेऊन गावातील व शेजारील गावांतील लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर भरवले होते.

समतावादी प्रतिष्ठान, जय भवानी मित्र मंडळ अंजप आणि रायगड हॉस्पिटल यांच्या वतीने स्व. भास्कर मिणमिणे यांच्या जयंतीनिमित्त नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात लहान बाळांची तपासणी, ईसीजी, ब्लड प्रेशर, मधुमेह, स्त्रियांच्या आजारांवरील तपासणी, सर्व बॉडी चेकअप करण्यात आले. तसेच अत्यंत अल्प दरात महिला आणि पुरुष यांची सोनोग्राफी आणि नेत्र तपासणी करण्यात आली. या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.

सोनोग्राफीसाठी बाहेरील खासगी रुग्णालयापेक्षा निम्म्यापेक्षा कमी पैसे घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी रोशन साळोखे यांनी सर्व लोकांना मोफत औषध वाटप केले. या सर्व आरोग्य शिबिरात गावातील तरुणांनी विशेष भाग घेत अनमोल साथ दिली. त्यात तानाजी मिणमिणे, नरेश मिणमिणे, गुरुनाथ मिणमिणे यांनी हे शिबीर यशस्वी केले. यावेळी १०० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी भालचंद्र थोरवे, अभिजित देशमुख, बाजीराव दळवी, रामचंद्र मिणमिणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी