फुटपाथवरील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

  101

भाईंदर (वार्ताहर) :- मीरा भाईंदर शहरात रस्त्यावर वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील लोकांना सुरक्षित रित्या चालता येत नाही त्याकरता पालिकेने ठिकठिकाणी फुटपाथ बनवले आहेत. मात्र शहरातील लोकांचे दुर्दैव इतके खराब आहे की अनधिकृत फेरीवाले, भाजीवाले, वाहन विक्रेते, गॅरेज चालक यांनी फुटपाथवर कब्जा करून लोकांना चालण्याकरता फुटपाथच ठेवले नाहीत, यामुळे लोकांना आपला जीव मुठीत घेऊन रसत्यावरून वाहनांचा सामना करत जावे लागत आहे व यामुळे अनेकदा अपघात होऊन काहीजण जख्मी देखील झाले आहेत तर काहीना जीव गमवावा लागला आहे. मात्र लोकांना होणाऱ्या त्रासाची दखल आता प्रभाग क्रमांक ४ च्या सभापती डॉ. प्रीती पाटील यांनी घेण्यास सुरवात केली आहे.

सभापती डॉ. प्रीती पाटील यांनी मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड़,अतिक्रमण विभाग प्रमुख,स्थानिक पोलिस स्टेशन, वाहतूक शाखा या सर्वाना पत्र व्यवहार करूण आज होणाऱ्या कारवाईला पालिकेच्या फ़ौजफाट्या सहित उपस्तित राहण्यास सांगण्यात आले होते. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास सभापती डॉ.प्रीती पाटील यांनी पालिका अधिकारी,कर्मचारी, स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस यांच्या सोबत गोल्डन नेस्ट चौक ते काशिमिरा पर्यंत फुटपाथ वरुण चालत जाऊन रसत्यात फुटपाथ वरुण चालण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व अनधिकृत गोष्टिवर जागेवर कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस