फुटपाथवरील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

भाईंदर (वार्ताहर) :- मीरा भाईंदर शहरात रस्त्यावर वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील लोकांना सुरक्षित रित्या चालता येत नाही त्याकरता पालिकेने ठिकठिकाणी फुटपाथ बनवले आहेत. मात्र शहरातील लोकांचे दुर्दैव इतके खराब आहे की अनधिकृत फेरीवाले, भाजीवाले, वाहन विक्रेते, गॅरेज चालक यांनी फुटपाथवर कब्जा करून लोकांना चालण्याकरता फुटपाथच ठेवले नाहीत, यामुळे लोकांना आपला जीव मुठीत घेऊन रसत्यावरून वाहनांचा सामना करत जावे लागत आहे व यामुळे अनेकदा अपघात होऊन काहीजण जख्मी देखील झाले आहेत तर काहीना जीव गमवावा लागला आहे. मात्र लोकांना होणाऱ्या त्रासाची दखल आता प्रभाग क्रमांक ४ च्या सभापती डॉ. प्रीती पाटील यांनी घेण्यास सुरवात केली आहे.

सभापती डॉ. प्रीती पाटील यांनी मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड़,अतिक्रमण विभाग प्रमुख,स्थानिक पोलिस स्टेशन, वाहतूक शाखा या सर्वाना पत्र व्यवहार करूण आज होणाऱ्या कारवाईला पालिकेच्या फ़ौजफाट्या सहित उपस्तित राहण्यास सांगण्यात आले होते. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास सभापती डॉ.प्रीती पाटील यांनी पालिका अधिकारी,कर्मचारी, स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस यांच्या सोबत गोल्डन नेस्ट चौक ते काशिमिरा पर्यंत फुटपाथ वरुण चालत जाऊन रसत्यात फुटपाथ वरुण चालण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व अनधिकृत गोष्टिवर जागेवर कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल