नाशिक शहरातील ९३ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

नाशिक (प्रतिनिधी ):कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरातील बाधितांचा आकडा वाढतच असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४,०६४ पर्यंत पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अवघे सात टक्के असून, ९३ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत २१५ रुग्ण महापालिका, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, यातील ६७ रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये कोमार्बिड रुग्णांसह लस न घेतलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यापासून शहरात कोरोनाने उसळी घेतली असून, दररोज बाधितांचा आकडा हा हजारापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नागरिक तसेच यंत्रणेत धडकी भरली असली तरी यातील बहुतांश बाधितांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समोर आले आहे. शहरातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा पर्यंत ४,०६४ पर्यंत पोहचला आहे. परंतु, यातील ९३ टक्के रुग्ण हे अलगीकरणात असून, ते घरी राहूनच उपचार घेत आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणे असून, या रुग्णांच्या प्रकृतीवर महापालिका लक्ष ठेवून आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. विशेष म्हणजे शहरातील करोनातून बरे होण्याची टक्केवारी ही ९७ टक्यांपर्यंत आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण हे सुरुवातीला ९० टक्क्यांपर्यंत होते. त्यामुळे शहरात सध्या तरी कोरोनाची तिसरी लाट ही सौम्य ठरल्याचे चित्र आहे.


लसवंतांना दिलासा


शहरातील अॅक्टिव्ह ४,०६४ रुग्णांपैकी २१५ रुग्ण हे महापालिका तसेच इतर रुग्णालयात दाखल आहेत. यातील २१ रुग्ण हे डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात, तर ६२ रुग्ण हे बिटको रुग्णालयात दाखल आहेत. त्यात ६७ रुग्ण ऑक्सिजनवर असून, १९ रुग्ण हे आयसीयूत अपचार घेत आहे. अकरा रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. विशेष म्हणजे दाखल रुग्णांमधील रुग्ण हे लस न घेतलेले तसेच कोमार्बिड रुग्ण आहेत. त्यामुळे लसवंतांना कोरोनाचा धोका सध्या कमी असून, लस न घेतलेल्यांसाठी तिसरी लाट तापदायक ठरत असल्याचे चित्र आहे.
Comments
Add Comment

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय