उल्हासनगरच्या सोंग्याच्या वाडीत बिबट्याचा वावर

उल्हासनगर : उल्हासनगरच्या सोंग्याच्या वाडीत बिबट्याचा वावर दिसून आल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वर्षीय मुलगी या जंगलात गेली होती आणि तेव्हा तिला हा बिबट्या निदर्शनास आला. तात्काळ तिने त्या ठिकाणावरून पळ काढला. या घटनेची माहिती स्थानिक नागरिक आणि पोलिसांना मिळताच वनविभागाला बोलविण्यात आले. सद्या सोंग्याच्या वाडीत वनविभागाच्या वतीने शोध कार्य सुरू असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.



अंबरनाथ शहरालगतच्या ग्रामीण भागात महिनाभरात बिबट्याकडून तब्बल ६ प्राण्यांची शिकार करण्यात आली आहे. तसेच मागील आठवड्यात अंबरनाथच्या ऑर्डनस फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला होता. आता हा बिबट्या रोड ओलांडून उल्हासनगरच्या दिशेने वाटचाल करत आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन सुभाष टेकडीकडे जाणाऱ्या सोंग्याच्या वाडीत हा बिबट्या दिसून आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने मागील अनेक महिन्यांपासून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी विनाकारण रात्रीच्या सुमारास घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान वनविभागाच्या वतीने परिसरात बिबट्याच्या पायाचे निशाण आढळून आल्यावरच बिबट्या आहे की नाही हे समजू शकणार आहे. उद्या पुन्हा वनविभागाच्या वतीने या परिसरात शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम