ज्यो रूट आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): चार वर्षांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात संधी न मिळालेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार ज्यो रूट हा पुढील हंगामामध्ये खेळण्यास उत्सुक आहे. २०२२ हंगामाच्या लिलावात सहभागी होण्याचे संकेत त्याने दिले आहे.



कसोटी कारकिर्दीवर परिणाम होणार नसेल, तर या लीगमध्ये खेळायला आवडेल, असे ३१ वर्षीय रूटने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले आहे. वेळ कमी आहे पण माझ्याकडे विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. माझ्या कसोटी क्रिकेट खेळण्यावर याचा नकारात्मक परिणाम होईल का? जर मला तसे वाटत नसेल, तर मी स्वतःला लिलावात उतरवेन. पण इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळणे कठीण होईल, असे मी कधीही करणार नाही. याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ती माझी आणि इतर खेळाडूंची प्राथमिकता असेल, असे रूटने म्हटले आहे. रूट हा आजच्या युगातील एक महान फलंदाज मानला जातो. मात्र, २०१८ मधील आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने रूटसाठी बोली लावली नाही. रूटने गेल्या वर्षी कसोटीत सर्वाधिक १७०८ धावा केल्या होत्या. त्याने ६ शतकेही झळकावली.



ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही आयपीएलमध्ये परतण्याचा विचार करत आहे. स्टार्कने शेवटची आयपीएल स्पर्धा २०१५ मध्ये खेळली होती. स्टार्कला २०१८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने ९.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण केकेआरला त्याला सोडावे लागले. आगामी आयपीएलच्या पुढील हंगामाचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे.

Comments
Add Comment

Gujrat Viral Video : काळ आला होता पण वेळ...गुजरातच्या वलसाडमधील लिफ्टचा भीषण अपघात; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

वलसाड : गुजरातच्या वलसाड येथील 'सरदार हाईट्स' या गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुलात आज सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी एक

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.

धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.