ज्यो रूट आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): चार वर्षांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात संधी न मिळालेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार ज्यो रूट हा पुढील हंगामामध्ये खेळण्यास उत्सुक आहे. २०२२ हंगामाच्या लिलावात सहभागी होण्याचे संकेत त्याने दिले आहे.



कसोटी कारकिर्दीवर परिणाम होणार नसेल, तर या लीगमध्ये खेळायला आवडेल, असे ३१ वर्षीय रूटने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले आहे. वेळ कमी आहे पण माझ्याकडे विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. माझ्या कसोटी क्रिकेट खेळण्यावर याचा नकारात्मक परिणाम होईल का? जर मला तसे वाटत नसेल, तर मी स्वतःला लिलावात उतरवेन. पण इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळणे कठीण होईल, असे मी कधीही करणार नाही. याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ती माझी आणि इतर खेळाडूंची प्राथमिकता असेल, असे रूटने म्हटले आहे. रूट हा आजच्या युगातील एक महान फलंदाज मानला जातो. मात्र, २०१८ मधील आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने रूटसाठी बोली लावली नाही. रूटने गेल्या वर्षी कसोटीत सर्वाधिक १७०८ धावा केल्या होत्या. त्याने ६ शतकेही झळकावली.



ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही आयपीएलमध्ये परतण्याचा विचार करत आहे. स्टार्कने शेवटची आयपीएल स्पर्धा २०१५ मध्ये खेळली होती. स्टार्कला २०१८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने ९.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण केकेआरला त्याला सोडावे लागले. आगामी आयपीएलच्या पुढील हंगामाचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे.

Comments
Add Comment

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत