‘जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’अभियान उत्साहात

  155

तलासरी :‘जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा कवाडा ठाकरपाडा येथे ३ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत पार पडला. या अभियानांतर्गत विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या समन्वयाने शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पहिल्या दिवशी प्रभात फेरी व प्रतिमा पूजन आणि अभिवादन, दुसऱ्या दिवशी वेशभूषा, आरोग्य तपासणी शिबिर, मासिक पाळी व्यवस्थापन उदबोधन वर्गाचे आयोजन, निबंध लेखन, आरोग्य सेविकेची मुलाखत, माझी उंची- माझी स्वप्ने विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन, पोवाडा गायन, महिला सक्षमीकरण यावर आधारीत व्याख्यान इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्पर्धेतील सहभागी विद्यार्थीनींना शाळेकडून बक्षिस देण्यात आले.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी झरी केंद्राचे केंद्र प्रमुख प्रधान व गटशिक्षणाधिकारी कमलाकर सुतार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या अभियानाचे पूर्व नियोजन व आयोजनाचे काम शाळेतील शिक्षक बाबू धोधडे, नवीन धोडी, अशोक धोडी यांनी केले, तर प्रत्यक्ष अभियानातील विविध कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाळेतील महिला शिक्षिका सुशिला तिरपुडे, गीता गुडपे, मंजुळा शनवार, सपना घरत, ललिता शिंदा व अंकिता धोडी यांचे योगदान लाभले.
Comments
Add Comment

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार