भारत-पाकिस्तान आमनेसामने?

  31

कराची : भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी आमनेसामने येण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी ‘मास्टरप्लॅन’ आखला आहे. दरवर्षी चार देशांची आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सीरिज खेळवण्याचा त्यांचा विचार आहे. ही स्पर्धा भारतासह पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात व्हावी, असे त्यांना वाटते. तसा प्रस्तावआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) मांडणार असल्याचे राजा यांनी सांगितले.



नमस्कार मित्रांनो! भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या चार देशांच्या टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सुपर सीरिजचा मी प्रस्ताव देईन. ही मालिका चार देशांद्वारे रोटेशनच्या आधारावर आयोजित केली जाईल, त्याचे महसूल मॉडेल वेगळे असेल, ज्यामध्ये सर्व सहभागी देश आयसीसीसोबत नफा शेअर करतील, असे ट्विट रमीझ राजा यांनी केले आहे.



भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडतात, तेव्हा मैदानावरील रोमांच शिगेला असतो. जगभरातील चाहतेही या क्षणाची वाट पाहत आहेत. आयसीसी टी-ट्वेन्टी विश्वचषक २०२१ मध्ये दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. त्यात प्रथमच भारताला हरवण्याची करामत पाकिस्तानने साधली. याआधी कोणत्याही विश्वचषकात पाकिस्तानला भारताला हरवता आले नव्हते.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी