युपीत ४८ तासांत सहा नेत्यांचा भाजपला 'राम राम' तर दोन आमदारांचा भाजपात प्रवेश

लखनऊ : देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर आता उत्तर प्रदेशात राजकीय नाट्य चांगलेच रंगल्याचे दिसते. विरोधक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विविध कारणांवरून घेरत असताना आता भाजपातील काही दिग्गजांनी ऐन निवडणुकीआधीच पक्षाला 'राम राम' केला आहे.


उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का बसला असून, ओबीसी नेते दारा सिंह चौहान यांनी योगी आदित्यनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत पक्ष सोडणारे चौहान हे सहावे नेते आहेत. मात्र, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर भाजप नेत्यांची दिल्लीत चर्चा झाली होती. दिल्लीत झालेल्या या बैठकांमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्य मंत्रिमंडळ सोडले होते. त्यानंतर भाजपचे आणखी एक आमदार अवतार सिंग भडाना यांनी पक्ष सोडला आणि समाजवादी पार्टीचे सहयोगी असलेल्या राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केला.


मौर्य यांच्या समर्थनार्थ भाजपच्या इतर तीन आमदारांनी पक्षातून राजीनामा देण्याची घोषणा केली. मंगळवारी, भाजप आमदार ब्रजेश प्रजापती, तिल्हारचे रोशन लाल वर्मा आणि बिल्हौरचे भगवती सागर यांनी आपण पक्ष सोडत असल्याची घोषणा केली होती.


तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे दोन आमदार काँग्रेसचे नरेश सैनी आणि सपामधील हरी ओम यादव हे दोघेही बुधवारी भाजपमध्ये सामील झाले.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च