कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा

देवा पेरवी


पेण : पेण रेल्वे स्थानकात जलदगती गाड्यांना थांबा मिळावा या पेणकरांच्या मागणीला यश आले असून दिवा - रत्नागिरी - दिवा या पॅसेंजर गाडीला आता पेण बरोबरच आपटा, जिते व कासु रेल्वे स्थानकात थांबा मिळाला असल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. पेण येथील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला असून भाजप उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यानुसार १५ जानेवारीपासून दिवा - रत्नागिरी - दिवा ही पॅसेंजर रेल्वे गाडी पेण, जिते, आपटा, कासु व नागोठणे बरोबरच रोहा येथील स्थानकात थांबणार आहे. कोरोना काळात बंद असलेली मेमु गाडी सुरु करण्यासाठी देखील पेण मधील नागरिकांना संघर्ष करावा लागला होता.

पेण येथील रेल्वे प्रवाशांना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नेहमीच सापत्न वागणूक दिली आहे. रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती स्थानक असलेल्या पेण स्थानकात एकही जलदगती रेल्वे गाडीला थांबा नसल्याने पेण, वडखळ, अलिबाग, पोयनाड, मुरूड परिसरातील प्रवाशांना जलदगती गाडीसाठी पनवेल, कल्याण, कर्जत, लोणावळा व मुंबई येथे जावे लागत आहे. पेण रेल्वे स्थानकात जलदगती रेल्वेगाडीला थांबा मिळावा यासाठी ‘मी पेणकर आम्ही पेणकर शाश्वत विकास संघर्ष समिती’ आणि पेण येथील रेल्वे प्रवाशांबरोबरच रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. वैकुंठ पाटील यांनी या बाबत तीन महिन्यांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील रेल्वे मुख्यालयात भेट घेऊन चर्चा करुन पेणच्या प्रवाशांच्या लेखी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या होत्या. याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले होते.
Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य