कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबत नवे धोरण

नवी दिल्ली: करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत असलेल्या धोरणात केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता केवळ तीन दिवसांतच रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. याबाबत आज केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य विभागाने बुधवारी देशातील कोविड स्थितीबाबत पत्रकार परिषदेत तपशील दिला. यावेळी कोविड बाबत सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयांची माहितीही देण्यात आली. कोविडची सध्या जी स्थिती आहे त्याचा आढावा घेण्यात आला. त्यातून रुग्णांची तीन प्रकारांत विभागणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


सौम्य, मध्यम आणि गंभीर असे हे तीन प्रकार असतील. त्याचवेळी करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबतचेही धोरण बदलण्यात येत आहे. त्यानुसार करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सलग तीन दिवस ताप नसेल तर रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असे मानले जाईल. त्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता असणार नाही, असे अगरवाल यांनी नमूद केले. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णालाही तीन दिवस ताप आला नाही आणि ऑक्सीजन सपोर्टशिवाय त्याची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेवल ९३ टक्केपेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज देता येईल. या रुग्णाचीही पुन्हा करोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. रुग्णालय व होम आयसोलेशन अशा दोन्हींसाठी हा नियम असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. गंभीर रुग्णाला सतत ऑक्सीजनची गरज भासत असेल. त्याची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेवल अपेक्षित नसेल तर उपचारांमध्ये खंड पडू देऊ नये. यात सुधारणा झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज देता येईल, असेही नमूद करण्यात आले.



ऑक्सिजनचा पुरेसा साठा ठेवा...


देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतान केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. केंद्र सरकारने राज्यांना पुन्हा पत्र लिहिले आहे. राज्यांनी आपल्याकडे ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी सूचना केंद्राने केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. पुरेसा मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध राहील, याची काळजी घ्यावी. त्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना केली आहे. रुग्णांची काळजी घेणाऱ्या सर्व आरोग्य सुविधा सज्ज ठेवा आणि किमान ४८ तास वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक उपलब्ध ठेवा.सर्व आरोग्य सुविधांमध्ये लिक्वीड वैद्यकीय ऑक्सिजन टाक्या पुरेशा प्रमाणात भरलेल्या हव्यात, असे पत्रात म्हटले आहे.
Comments
Add Comment

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान

Apple Event 2026 : ॲपलचा भारतात महाधमाका! आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली 'MacBook Pro 2026' लाँच; कधी सुरु होणार प्री ऑर्डर ?

मुंबई : टेक विश्वातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने (Apple) भारतीय बाजारपेठेत आपले सर्वात शक्तिशाली लॅपटॉप MacBook Pro (2026) अधिकृतपणे

PM Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची ओमान, कतारच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर पश्चिम आशिया प्रदेशातील परिस्थिती झपाट्याने

Iran Israel War : युद्धाच्या सावटाखालील मराठी नागरिकांसाठी मुख्यमंत्री मदतीला धावले; विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन जारी

परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास अलर्ट मोडवर मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर,