नामाचे सूक्ष्म स्वरूप

Share

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

नुसते ‘राम राम’ म्हणून राम कसा भेटेल, हा प्रश्न माणूस सहजच विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की, समजा एखादा मनुष्य ‘नोकरी नोकरी’ असा जप करीत खोलीत बसला, तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का? वरकरणी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा, पण थोडासा विचार केला, तर तो इथे मुळीच लागू पडत नाही, असे कळून येईल. जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा, त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात. ‘रामनाम’ आणि ‘नोकरी’ यांचे परिणाम एकमेकांविरुद्ध आहेत. ‘राम राम’ म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वत:च्या विस्मरणात होत असतो; म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे, म्हणजे स्थुलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे, हा ‘राम राम’ म्हणण्याचा परिणाम; परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरुद्ध आहे. मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे. नंतर ती मिळावी म्हणून दहाजणांचे आर्जव करायचे, त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची. म्हणजे नोकरी या कल्पनेतून, सूक्ष्मातून, स्थुलात जाणे हा नोकरीचा प्रकार. पण ‘राम राम’ म्हणणे हा प्रकार स्थूलांतून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे. यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही, हे स्पष्ट होते.

दुसरी गोष्ट म्हणजे, ‘नोकरी नोकरी’ असा जप करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच, पण ‘राम राम’ म्हणून राम मिळणे कसे सोपे, किंबहुना कसे हमखास शक्य आहे, हे पाहा. नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून, ती प्रत्यक्षात आणण्याकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते, हे आपण आत्ताच पाहिले. तसेच, घर बांधणे ही कल्पना; ती पूर्ण करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे, या हेतूने सर्व जिनसा पैदा करून त्यात आणून ठेवणे, म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला. आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे. ‘राम राम’ म्हणण्याचे उद्दिष्ट, स्थुलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे; म्हणजेच, अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एकेक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे. ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे. तेव्हा ‘नोकरी नोकरी’ म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण, तितकेच ‘राम राम’ म्हणून राम मिळणे निश्चित आहे. सबब ‘राम राम’ म्हणून राम कसा भेटेल, अशी शंका न घेता ‘राम राम’ जपावे. मनाच्या सर्व दु:खाला कारण देहबुद्धी आहे. ती जायला उपाय एकच; प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे. त्याच्या योगाने सर्व मल जाईल. नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे. ‘मी’पणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

2 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

3 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

4 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

4 hours ago