रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात बेमुदत उपोषण सुरू

  90

देवरूख  :संगमेश्वर तालुक्यातील कडवई ते तुरळ रस्त्याचे निकृष्ट काम तसेच कडवई तुरळ रस्त्याची दुरवस्था या विरोधात रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्या वतीने तुरळ येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरातून वाढता पाठिंबा व्यक्त होत आहे.



कोरोनाचे नियम लक्षात घेऊन रिक्षा संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण, सहखजिनदार राजेंद्र गिज्ये, मोहन कुंभार, महेंद्र चोपडे, सुभाष बोबले हे पाच पदाधिकारी उपोषणास बसले असून बाकी सर्व सदस्यांनी आपल्या रिक्षा बेमुदत बंद ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या आंदोलनाला राजकीय पक्षाकडून जाहीर पाठिंबा व्यक्त होत आहे.



मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, तुरळ सरपंच राधिका गिज्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर, राजीवली उपसरपंच संतोष येडगे, नवनिर्मिती फाऊंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, चिखली ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम, राजवाडी उपसरपंच दिलीप गुरव, मनसे उपतालुकाध्यक्ष महेश गुरव, नंदकुमार फडकले, उदय घाग, राष्ट्रवादी उप तालुका अध्यक्ष फैयाझ माखजनकर, रामचंद्र किंजळकर, विजय साळवी, रमेश डीके यांनी उपस्थिती दर्शवून जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही