देवरूख :संगमेश्वर तालुक्यातील कडवई ते तुरळ रस्त्याचे निकृष्ट काम तसेच कडवई तुरळ रस्त्याची दुरवस्था या विरोधात रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्या वतीने तुरळ येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरातून वाढता पाठिंबा व्यक्त होत आहे.
कोरोनाचे नियम लक्षात घेऊन रिक्षा संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण, सहखजिनदार राजेंद्र गिज्ये, मोहन कुंभार, महेंद्र चोपडे, सुभाष बोबले हे पाच पदाधिकारी उपोषणास बसले असून बाकी सर्व सदस्यांनी आपल्या रिक्षा बेमुदत बंद ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या आंदोलनाला राजकीय पक्षाकडून जाहीर पाठिंबा व्यक्त होत आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, तुरळ सरपंच राधिका गिज्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर, राजीवली उपसरपंच संतोष येडगे, नवनिर्मिती फाऊंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, चिखली ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम, राजवाडी उपसरपंच दिलीप गुरव, मनसे उपतालुकाध्यक्ष महेश गुरव, नंदकुमार फडकले, उदय घाग, राष्ट्रवादी उप तालुका अध्यक्ष फैयाझ माखजनकर, रामचंद्र किंजळकर, विजय साळवी, रमेश डीके यांनी उपस्थिती दर्शवून जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…