रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात बेमुदत उपोषण सुरू

देवरूख  :संगमेश्वर तालुक्यातील कडवई ते तुरळ रस्त्याचे निकृष्ट काम तसेच कडवई तुरळ रस्त्याची दुरवस्था या विरोधात रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्या वतीने तुरळ येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरातून वाढता पाठिंबा व्यक्त होत आहे.



कोरोनाचे नियम लक्षात घेऊन रिक्षा संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण, सहखजिनदार राजेंद्र गिज्ये, मोहन कुंभार, महेंद्र चोपडे, सुभाष बोबले हे पाच पदाधिकारी उपोषणास बसले असून बाकी सर्व सदस्यांनी आपल्या रिक्षा बेमुदत बंद ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या आंदोलनाला राजकीय पक्षाकडून जाहीर पाठिंबा व्यक्त होत आहे.



मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, तुरळ सरपंच राधिका गिज्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर, राजीवली उपसरपंच संतोष येडगे, नवनिर्मिती फाऊंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, चिखली ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम, राजवाडी उपसरपंच दिलीप गुरव, मनसे उपतालुकाध्यक्ष महेश गुरव, नंदकुमार फडकले, उदय घाग, राष्ट्रवादी उप तालुका अध्यक्ष फैयाझ माखजनकर, रामचंद्र किंजळकर, विजय साळवी, रमेश डीके यांनी उपस्थिती दर्शवून जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला