पालिकेत होणार आयुर्वेदिक, होमियोपथी डॉक्टरांची भरती

पालघर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने डॉक्टर भरतीस सुरवात केली आहे. पालिकेने बंद केलेले कोरोना उपचार केंद्र पुन्हा एकदा सुरू केल्यामुळे डॉक्टरांची गरज लागणार असून त्यासाठी ३० डॉक्टरांची ठेका पद्धतीवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये १५ आयुर्वेदिक व १५ होमियोपथी डॉक्टरांचा समावेश आहे.



राज्यात तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले. वसई-विरार महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णवाढही नोंदवली गेली होती. मागील पाच दिवसांत चार हजाराच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेने तात्पुरती बंद केलेली कोरोना उपचार केंद्रे पुन्हा सुरू केली आहेत. यामध्ये बोळींज आणि नालासोपारा तसेच वरुण इंडस्ट्री येथील उपचार केंद्राचा समावेश आहे. तसेच पालिका आता म्हाडाची इमारत ताब्यात घेऊन उपचार केंद्र सुरू करणार आहे.



या सर्व केंद्रांवर उपचारासाठी पालिकेच्या डॉक्टरांचा ताफाही कमी पडत असल्याने पालिकेने अतिरीक्त डॉक्टर भरती करण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ठेका पद्धतीवर पूर्वी नेमण्यात आलेल्या डॉक्टरांपैकी ३० डॉक्टरांना पुन्हा नियुक्ती देण्यात येणार आहे. या डॉक्टरांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ठेका पद्धतीवर घेण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने नियुक्ती प्रक्रिया सुरु केली आहे.

Comments
Add Comment

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त