पालिकेत होणार आयुर्वेदिक, होमियोपथी डॉक्टरांची भरती

  80

पालघर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने डॉक्टर भरतीस सुरवात केली आहे. पालिकेने बंद केलेले कोरोना उपचार केंद्र पुन्हा एकदा सुरू केल्यामुळे डॉक्टरांची गरज लागणार असून त्यासाठी ३० डॉक्टरांची ठेका पद्धतीवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये १५ आयुर्वेदिक व १५ होमियोपथी डॉक्टरांचा समावेश आहे.



राज्यात तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले. वसई-विरार महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णवाढही नोंदवली गेली होती. मागील पाच दिवसांत चार हजाराच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेने तात्पुरती बंद केलेली कोरोना उपचार केंद्रे पुन्हा सुरू केली आहेत. यामध्ये बोळींज आणि नालासोपारा तसेच वरुण इंडस्ट्री येथील उपचार केंद्राचा समावेश आहे. तसेच पालिका आता म्हाडाची इमारत ताब्यात घेऊन उपचार केंद्र सुरू करणार आहे.



या सर्व केंद्रांवर उपचारासाठी पालिकेच्या डॉक्टरांचा ताफाही कमी पडत असल्याने पालिकेने अतिरीक्त डॉक्टर भरती करण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ठेका पद्धतीवर पूर्वी नेमण्यात आलेल्या डॉक्टरांपैकी ३० डॉक्टरांना पुन्हा नियुक्ती देण्यात येणार आहे. या डॉक्टरांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ठेका पद्धतीवर घेण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने नियुक्ती प्रक्रिया सुरु केली आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान - एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - अजित पवार

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, कारवाईची मागणी

विधान परिषदेत शिवसेना आमदाराने उठवला मुद्दा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन मुंबई : महाराष्ट्राची