पालघर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने डॉक्टर भरतीस सुरवात केली आहे. पालिकेने बंद केलेले कोरोना उपचार केंद्र पुन्हा एकदा सुरू केल्यामुळे डॉक्टरांची गरज लागणार असून त्यासाठी ३० डॉक्टरांची ठेका पद्धतीवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये १५ आयुर्वेदिक व १५ होमियोपथी डॉक्टरांचा समावेश आहे.
राज्यात तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले. वसई-विरार महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णवाढही नोंदवली गेली होती. मागील पाच दिवसांत चार हजाराच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेने तात्पुरती बंद केलेली कोरोना उपचार केंद्रे पुन्हा सुरू केली आहेत. यामध्ये बोळींज आणि नालासोपारा तसेच वरुण इंडस्ट्री येथील उपचार केंद्राचा समावेश आहे. तसेच पालिका आता म्हाडाची इमारत ताब्यात घेऊन उपचार केंद्र सुरू करणार आहे.
या सर्व केंद्रांवर उपचारासाठी पालिकेच्या डॉक्टरांचा ताफाही कमी पडत असल्याने पालिकेने अतिरीक्त डॉक्टर भरती करण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ठेका पद्धतीवर पूर्वी नेमण्यात आलेल्या डॉक्टरांपैकी ३० डॉक्टरांना पुन्हा नियुक्ती देण्यात येणार आहे. या डॉक्टरांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ठेका पद्धतीवर घेण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने नियुक्ती प्रक्रिया सुरु केली आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…