पवारांना अद्याप वेळ का मिळाला नाही?

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. संपामुळे ग्रामीण भागातल्या जनतेचे हाल होताहेत, हे सरकारला आत्ता समजले? लाल परी धावत नसल्याने ग्रामीण भागातली प्रवास व्यवस्था लंगडी झाली आहे. त्याकडे लक्ष द्यायला शरद पवार यांना आजवर का वेळ झाला नाही? आजचा मुहूर्त होता का? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.


तसेच, बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मनोरंजन केले. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही, असे परब सांगतात. मग आजवर कारवाई झालेल्यांचे काय? कारवाईची भीती मविआ सरकारवरील अविश्वासातून निर्माण होते आहे. कारवाई नाही, पगारवाढीसाठी चर्चा करू, विलिनीकरणाचे कोर्ट सांगेल ते पाहू... मग मविआ सरकारकडे कर्मचाऱ्यांसाठी आहेच काय?’, असाही प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.

Comments
Add Comment

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास