मुंबई : सध्या मुंबईत ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी रांगा लावत आहेत. दरम्यान वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पालिकेने प्रत्येक विभागात फिव्हर क्लिनिक सुरू केले आहे.
मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्णांची मोठ्या प्रमाणात नोंद होत असून बदललेल्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, घसा दुखीचेही रुग्ण वाढले आहेत. यापैकी काही लक्षणे कोरोनाची असून सर्वसामान्य विषाणूजन्य आजारातही हीच लक्षणे आहेत. त्यामुळे लोकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
मात्र या परिस्थितीत कोरोनाच्या रुग्णांपर्यंत पोहचता यावे यासाठी महापालिका खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन डॉक्टरांना उपचार आणि चाचण्यांबाबत मार्गदर्शन करणार आहे, असे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
पालिकेतर्फे फिव्हर क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक विभागात असे फिव्हर क्लिनीक होतील. जेथे जागा उपलब्ध असेल तेथे क्लिनीकचे कॅम्प घेण्यात येणार आहेत. पालिकेच्या दवाखान्यांमध्येही हे क्लिनीक सुरू करण्यात आले आहेत, असे काकाणी यांनी सांगितले.
दरम्यान मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिवसभरात २० हजारांच्या जवळपास रुग्णसंख्या नोंदविली जात आहे. त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईकरांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान आता ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनासह साथीच्या आजारांना रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. दरम्यान ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेतर्फे फिव्हर क्लिनीक सुरू करण्यात आले आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…