नाशिकमधील कर्मचारी संपावर ठाम

नाशिक: नाशिक येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नाही. संपकरी कर्मचारी हे आपल्या मागण्यायवर अडून बसले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, असे कर्मचारी संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.


तसेच कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. असे असतांना मात्र नाहीकमधील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून विलनीकरणाची प्रमुख मागणी पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.नाशिक येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘आज बैठकीत समील झालेल्या २२ संघटनांशी आमचा संबंध नाही. आमचा दुखवटा आंदोलन सुरूच राहणार असून विलनीकरण होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एका यशस्वी बैठकीनंतरही नाशिक मधील कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने विलीनीकरणाचा तिढा कायम राहिला आहे.

Comments
Add Comment

Girija Oak Godbole : निळ्या साडीतील गिरिजा ओक बनली 'नॅशनल क्रश'! सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X),

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

उद्या आणि परवा मुंबईत पाणीबाणी!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८००

महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांकडे राखीव निवडणूक चिन्ह

राष्ट्रीय, राज्यस्तरीय वगळता छोट्या पक्षांची होणार दमछाक मुंबई  : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

माहिममध्ये उबाठाकडे मनसेची खुल्या प्रभागांची मागणी, पाच पैंकी तीन खुले प्रभाग आपल्याकडे घेण्याचा मनसेचा विचार

मुंबई (सचिन धानजी):  मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता

पिसे पांजरापूर येथे ९१० दशलक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणार, आता केंद्राची क्षमता होणार १८२० दशलक्ष लिटर

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरणातून आलेल्या पाण्यावर भांडुप संकुल आणि