पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

  99

मुंबई  : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान विशेष भाडे आकारून सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.



ट्रेन क्रमांक ०९६२२ वांद्रे टर्मिनस-अजमेर सुपरफास्ट स्पेशल (साप्ताहिक) ट्रेन प्रत्येक सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि पुढच्या दिवशी सकाळी ९.१० वाजता अजमेर पोहचेल. ही ट्रेन १०,१७, २४ आणि ३१ जानेवारी २०२२ या दिवशी असेल. तर ट्रेन क्रमांक ०९६२१ अजमेर-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी अजमेर येथून सकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहचेल.


ही ट्रेन ९, १६, २३ आणि ३० जानेवारी २०२२ या दिवशी असेल. ही ट्रेन प्रवासादरम्यान बोरीवली, वापी, सूरत, बडोदा, रतलाम, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, जयपूर और किशनगढ या स्थानकांवर थांबेल.
या रेल्वेबाबतच्या अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in येथे भेट द्या.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.