पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

  108

मुंबई  : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान विशेष भाडे आकारून सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.



ट्रेन क्रमांक ०९६२२ वांद्रे टर्मिनस-अजमेर सुपरफास्ट स्पेशल (साप्ताहिक) ट्रेन प्रत्येक सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि पुढच्या दिवशी सकाळी ९.१० वाजता अजमेर पोहचेल. ही ट्रेन १०,१७, २४ आणि ३१ जानेवारी २०२२ या दिवशी असेल. तर ट्रेन क्रमांक ०९६२१ अजमेर-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी अजमेर येथून सकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहचेल.


ही ट्रेन ९, १६, २३ आणि ३० जानेवारी २०२२ या दिवशी असेल. ही ट्रेन प्रवासादरम्यान बोरीवली, वापी, सूरत, बडोदा, रतलाम, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, जयपूर और किशनगढ या स्थानकांवर थांबेल.
या रेल्वेबाबतच्या अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in येथे भेट द्या.

Comments
Add Comment

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards : “आईच्या साडीचा अभिमान… पुरस्कार स्विकारताना काजोल भावूक”, काजोलचं मराठी भाषण ठरलं खास आकर्षण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात

दूध भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दूध स्कॅनर

मुंबई (वार्ताहर) : दूध भेसळीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे रोखण्यासाठी

सणासुदीच्या हंगामात नारळ, डाळींचे चढे दर

मुंबई (वार्ताहर) :सध्या सणांचा काळ सुरु झाल्यामुळे डाळी तसेच नारळाचा वापर धार्मिक विधी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी