पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

मुंबई  : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस आणि अजमेर दरम्यान विशेष भाडे आकारून सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.



ट्रेन क्रमांक ०९६२२ वांद्रे टर्मिनस-अजमेर सुपरफास्ट स्पेशल (साप्ताहिक) ट्रेन प्रत्येक सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि पुढच्या दिवशी सकाळी ९.१० वाजता अजमेर पोहचेल. ही ट्रेन १०,१७, २४ आणि ३१ जानेवारी २०२२ या दिवशी असेल. तर ट्रेन क्रमांक ०९६२१ अजमेर-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी अजमेर येथून सकाळी ६.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहचेल.


ही ट्रेन ९, १६, २३ आणि ३० जानेवारी २०२२ या दिवशी असेल. ही ट्रेन प्रवासादरम्यान बोरीवली, वापी, सूरत, बडोदा, रतलाम, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, जयपूर और किशनगढ या स्थानकांवर थांबेल.
या रेल्वेबाबतच्या अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in येथे भेट द्या.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत