क्रीडा भवन सुरू करण्याकडे दुर्लक्ष

मुंबई  : गेल्या ११ वर्षांपासून मुंबईतील महापालिका मुख्यालयासमोर तसेच शिवाजी पार्क येथील पालिकेची क्रीडा भवन बंद आहेत. ही क्रीडा भवन पुन्हा सुरू करण्यासाठी सन २०१७ मध्ये विधी समितीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यावेळी क्रीडा भवनासाठी नियमावली तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र असे असूनही पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून क्रीडा भवन सुरू करण्यासाठी प्रशासनाची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.



मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा गुणांना उभारी देण्यासाठी पालिका प्रशासनाने १९२६ मध्ये क्रीडा भवनाची स्थापना केली तर २०१० मध्ये क्रीडा भवनाच्या कार्यकारिणीमधील सदस्यांवर झालेल्या गैरकारभाराच्या आरोपानंतर क्रीडा भवन बंद करण्यात आले होते. मात्र ते उघडण्यासाठी २०१७ मध्ये विधी समिती व पालिका सभागृहात क्रीडा भवन सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावेळी नवीन नियमावली तयार करण्याचे नगरसेवकांनी सुचवूनही गेल्या चार वर्षांत नियमावली तयार झालेली नाही. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला