क्रीडा भवन सुरू करण्याकडे दुर्लक्ष

मुंबई  : गेल्या ११ वर्षांपासून मुंबईतील महापालिका मुख्यालयासमोर तसेच शिवाजी पार्क येथील पालिकेची क्रीडा भवन बंद आहेत. ही क्रीडा भवन पुन्हा सुरू करण्यासाठी सन २०१७ मध्ये विधी समितीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यावेळी क्रीडा भवनासाठी नियमावली तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र असे असूनही पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून क्रीडा भवन सुरू करण्यासाठी प्रशासनाची कोणतीही हालचाल दिसत नसल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे.



मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा गुणांना उभारी देण्यासाठी पालिका प्रशासनाने १९२६ मध्ये क्रीडा भवनाची स्थापना केली तर २०१० मध्ये क्रीडा भवनाच्या कार्यकारिणीमधील सदस्यांवर झालेल्या गैरकारभाराच्या आरोपानंतर क्रीडा भवन बंद करण्यात आले होते. मात्र ते उघडण्यासाठी २०१७ मध्ये विधी समिती व पालिका सभागृहात क्रीडा भवन सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावेळी नवीन नियमावली तयार करण्याचे नगरसेवकांनी सुचवूनही गेल्या चार वर्षांत नियमावली तयार झालेली नाही. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ