जव्हार भाजपाकडून पंजाब सरकारचा निषेध

जव्हार :पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा घेण्यासाठी जात असताना आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा बुधवारी एका उड्डाणपुलावर सुमारे २० मिनिटे अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदी नियोजित सभा न घेताच दिल्लीला परतले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या गंभीर त्रुटीवरुन मोठा राजकीय वाद उफाळला आहे. यावर संतप्त झालेल्या जव्हार भाजपने पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पंजाब सरकारचा निषेध केला आहे.

यावेळी भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, राष्ट्रीय जनजाती सदस्य हरिश्चंद्र भोये, बाबाजी कोटोळे, पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा थेतले, डॉ. हेमंत सवरा, जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटानेकर,शहरअध्यक्ष नागेश उदावंत, चेतन पारेख, सुधाकर गावित, उमेश नायकर, विलास चव्हाण,तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक घडल्याने मोठे वादळ उठले असून यामागे खूप मोठे षडयंत्र होते, असा दावाही करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल