जव्हार भाजपाकडून पंजाब सरकारचा निषेध

जव्हार :पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा घेण्यासाठी जात असताना आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा बुधवारी एका उड्डाणपुलावर सुमारे २० मिनिटे अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदी नियोजित सभा न घेताच दिल्लीला परतले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या गंभीर त्रुटीवरुन मोठा राजकीय वाद उफाळला आहे. यावर संतप्त झालेल्या जव्हार भाजपने पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पंजाब सरकारचा निषेध केला आहे.

यावेळी भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, राष्ट्रीय जनजाती सदस्य हरिश्चंद्र भोये, बाबाजी कोटोळे, पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा थेतले, डॉ. हेमंत सवरा, जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटानेकर,शहरअध्यक्ष नागेश उदावंत, चेतन पारेख, सुधाकर गावित, उमेश नायकर, विलास चव्हाण,तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक घडल्याने मोठे वादळ उठले असून यामागे खूप मोठे षडयंत्र होते, असा दावाही करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.