६९० निधानसभा जागांवर होणार निवडणूका,सात टप्प्यात रंगणार महासंग्राम

  84

दिल्ली : ६९० निधानसभा जागांवर निवडणूका होणार असल्याचं आज मुख्य निवडणूक आयोग सुशील चंद्र यांनी पत्रकार परिषदेते स्पष्ट केलं.  उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड या राज्याच्या निवडणूका पार पडणार आहेत. पाच राज्यांच्या निवडणूका सात टप्प्यात होणार आहेत. तर पाचही राज्यात १० मार्चला मतमोजणी होणार आहे.

कोरोना काळात निवडणूका घेणे आव्हानात्मक असल्याचंदेखील मुख्य निवडणूक आयोगांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. या निवडणूकीत एकूण १८ कोटी ३० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार. तर २४.९ लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी महिल्यांसाठी १ हजार ६२० मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.

वेळेवर निवडणूका घेणे ही आमची जबाबदारी होती. प्रत्येक निवडूक केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरची सोय करण्यात येणार आहे. तसंच कोरोना काळात नियमांचं पालन करून निवडणूका पार पडणार असल्यांचं देखील मुख्य निवडणूक आयोगांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.

गोवा आणि मणिपूरच्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा 25 लाख रुपये तर पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडत्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा ४० लाख असेल तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती घोषित करावी लागेल असंदेखील यावेळी सुशील चंद्र यांनी सांगितलं

यंदाच्या निवडणूकीत कोरोनामुळे पाचही राज्यांच्या मतदानाच्यावेळेत एक तासाची वाढ करण्यात आलीय.

तसंच सोशल मीडियावरून जास्तीत जास्त प्रचार करावा असं आवाहन यावेळी मुख्य निवडणूक आयोगांनी केलंय. 15 जानेवारीपर्यंत कुठल्याही प्रकारची रॅली काढण्यात येणार नाही. सर्व प्रकारच्या रॅलीवर निवडणूक आयोगांकडून बंदीची घोषणा करण्यात आलीय. रोड शो, रॅली, बाईक रॅली, पदयात्रा, काढता येणार नाही आणि डोअर टू डोअर प्रचार करताना पाचपेक्षा अधिक जणांना परवानगी नसणार असंहीदेखी ते यावेळी म्हणाले.

उत्तर प्रदेश निवडणूकीचा पहिला टप्पा १० फेब्रुवारीला आणि दुस-या टप्पा १४ फेब्रुवारीला , तिसरा टप्पा २०  फेब्रुवारीला असेल . पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात निवडणूका होणार आहेत तर पाचही राज्यात १० मार्चला मतमोजणी होणार आहे. गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदाना पार पडणारेय आणि १० मार्चला मतमोजणी होणार आहे. गोव्यात उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी असेल.

मणिपूरमध्ये निवडणूकीचा पहिला टप्पा 27 फेब्रुवारी, आणि दुसरा टप्पा ३ मार्च असेल.
Comments
Add Comment

श्रावण संपताच माशांच्या खरेदीवरून हायवेवर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

गोरखपूर: श्रावण महिना संपताच मासे खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या खवय्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र

प्रवाशाला अस्वच्छ सीट दिल्याने इंडिगो एअरलाईन्सला दिड लाखांचा दंड, दिल्ली ग्राहक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली: दिल्ली ग्राहक तक्रार निवारण आयोगाने इंडिगो एअरलाइन्सवर सेवेत कमतरता दाखवून प्रवाशाला अस्वच्छ व डाग

मनी लाँड्रिंग प्रकरणात रॉबर्ट वाड्राच्या अडचणी वाढल्या

दोन कंपन्यांमधून ५८ कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाईचा रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आरोप नवी दिल्ली: मनी लाँड्रिंग

'काही लोकं स्वतःला जगाचे "बॉस" समजतात... त्यांना भारताची प्रगती पाहवत नाही': संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भोपाळ: बीईएमएलच्या नवीन रेल्वे कोच फॅक्टरीचे भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी

काश्मीरमधील घोडेवाला सय्यद आदिल हुसैन शाहच्या कुटुंबियांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

शिवसेना आपल्या पाठीशी कायम उभी राहील असे शिंदेंकडून आदिलच्या कुटुंबियांना आश्वासन जम्मू आणि काश्मीर:

मोदींच्या हस्ते तीन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे एका विशेष समारंभात तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा