पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करा

  81

पालघर  : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी भाजपा वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवण्याच्या षडयंत्राची सखोल चौकशी व्हावी.तसेच पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी पंजाबमध्ये जे काही घडले ते अत्यंत गंभीर असून या घटनेचा वसई-विरार जिल्हा भाजप तीव्र निषेध करत आहे. या घटनेची राष्ट्रपतींनी गंभीर दखल घेतली पाहिजे.


पक्षीय द्वेषापोटी देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेशी घातक खेळ आजवर कोणीच केला नव्हता. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची व्यूहरचना व कार्यवाही केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणा परस्परांशी समन्वय ठेवून आखत असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेला राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेकडून सहकार्य मिळणे अपेक्षित असते. मात्र पंजाबातील घटनाक्रम पाहिला तर असे लक्षात येते की, पंतप्रधानांच्या मार्गावर जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी दिली गेली. आंदोलकांमुळे पद्धतशीरपणे रस्ता बंद होईल, याची दक्षता घेतली गेली. जेथे हे घडले तेथून पाकिस्तानची सीमा अतिशय जवळ आहे. पंतप्रधानांचा जीव जाणीवपूर्वक धोक्यात आणण्यासाठी केली गेलेली ही खेळी होती.



पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुका या देशाच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. या घटनेसंदर्भात कॉंग्रेस नेत्यांनी बेजबाबदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.पंतप्रधान,हा देशाचा असतो तो कोण्या एका पक्षाचा नसतो.एवढी घटना घडूनही मुख्यमंत्री प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होत नाहीत,ही लाजीरवाणी गोष्ट आहे.खालच्या पातळीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,असे जिल्हाध्यक्ष नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी