एसटी संपामुळे खासगी बस व्यावसायिक जोमात तर एसटी कोमात

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुणे विभागातून राज्यातील सुमारे ९० टक्के मार्ग बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी बस शिवाय पर्याय नाही. परिणामी खासगी बस व्यावसायिक अवाच्या सव्वा तिकीट दर आकारत असल्याने ते जोमात असून, एसटी कोमात असल्याचे चित्र आहे.


एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने थेट खासगी बसगाड्यांना एसटी आगारातून प्रवासी बस वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर २५० ते ३०० किलोमीटर मार्गावर पश्चिम महाराष्ट्रात (मुख्यत्वे सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद) बसगाड्या स्थानकावरून धावत आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या (नागपूर, अमरावती, गडचिरोली, भंडारा, लातूर, उस्मानाबाद, बीड) मार्गावर धावणाऱ्या गाड्या स्थानकावर दाखलच झाल्या नाहीत. या मार्गासाठी खासगी बसच्या कार्यालयातून बुकिंग घेतले जाते. खासगी बसच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी करून अवाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Satyajeet Tambe : सत्यजित तांबे अखेर भाजपच्या उंबरठ्यावर? मामा बाळासाहेब थोरातांनीच दिले 'ग्रीन सिग्नल'; म्हणाले, 'तो सज्ञान...

अहिल्यानगर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष

धक्कादायक! शिरुरमध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी पेटवले वनविभागाचे कार्यालय

पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच नागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे

आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; जनता महायुतीसोबत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांना चपराक पंढरपूर :“आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मो o-.र्चे

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप