पुलवामा चकमकीत तीन दहशतवादी ठार

जम्मू  : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक आहे. या दहशतवाद्यांकडून दोन एम-४ कार्बाइन आणि एक एके सीरीज रायफलसह गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पाचव्या दिवसांतील ही चौथी चकमक आहे. अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये सैन्याने ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे, पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने बुधवारी सकाळी जिल्ह्यातील चंदगाम गावात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. दोन्ही बाजूंच्या चकमकीत एका पाकिस्तानीसह जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले. जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा हे मोठे यश असल्याचे यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले.

दक्षिण काश्मीरमध्ये सोमवारपासूनची ही दुसरी चकमक आहे. कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन स्थानिक दहशतवादी ठार झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये कारवाई करण्याचे धाडस केले होते. याला सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलाच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता.
Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन