भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य

  67

जोहान्सबर्ग : दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
२ बाद ८५वरून भारताने दुसऱ्या डावात बुधवारी २३९ धावांची मजल मारली. त्याचे क्रेडिट चेतेश्वर पुजारा (५३ धावा)आणि अजिंक्य रहाणे (५८ धावा) या सीनियर्ससह अष्टपैलू हनुमा विहारी (नाबाद ४० धावा) तसेच शार्दूल ठाकूरला (२८ धावा) जाते. दक्षिण आफ्रिकेने बोनस म्हणून दिलेल्या ३३ अवांतर धावा भारताला अडीचशेच्या घरात पोहोचवण्यास मोलाच्या ठरल्या.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत होते. पुजाराला दुसऱ्या डावात अखेर सूर गवसला. त्याने अर्धशतक झळकावलं. कसोटी कारकिर्दीतील त्याचं ३२ वं अर्धशतक आहे. त्यानंतर लगेचच अजिंक्य रहाणेने अर्धशतकी पूर्ण केले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली आहे. शतकी भागीदारी फोडण्यात कागिसो रबाडाला यश आलं. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा त्याच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रिषभ पंतला भोपळाही फोडता आला नाही. तीन चेंडू खेळून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

आर. अश्विन आणि हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लुन्गी एन्गिडीच्या गोलंदाजीवर अश्विन झेलबाद झाला. आर. अश्विन १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूरने झटपट खेळी करत २४ चेंडूंत २८ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. मात्र मार्को जॅन्सेनच्या गोलंदाजीवर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद शमी खातंही खोलू शकला नाही. मार्कोच्या गोलंदाजीवर बाद झाला. जसप्रीत बुमराच्या रुपाने भारताना नववा धक्का बसला आहे. बुमराहने १४ चेंडूंत ७ धावा केल्या. यात एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद सिराजही खातेही उघडू शकला नाही. अष्टपैलू हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला.

दक्षिण आफ्रिकेकडून रबाडासह एन्गिडी तसेच जॅन्सेनने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मात्र, यजमान गोलंदाजांनी ३३ धावांचा बोनसही दिला. त्यात १६ बाइजसह ८ नोबॉल आणि ५ वाइड चेंडूंचा समावेश आहे.
पहिल्या डावात भारताने २०२ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिका संघाने २२९ धावा केल्या आणि २७ धावांची आघाडी घेतली होती.
Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार