भीषण रस्ता अपघातात 15 जणांचा मृत्यू

रांची : झारखंडच्या पाकूर जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आम्रपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडेर कोला गावाजवळ हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिट्टीपारा-आम्रापाडा मुख्य रस्त्यावर पडेर कोलाजवळ एक खाजगी बस आणि सिलेंडरने भरलेल्या ट्रकची समोरा समोर धडक झाली. अनियंत्रित ट्रक बसवर जोरात आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मृतांमध्ये बहुतांश जण हे बसमध्ये प्रवास करत होते. मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.


अपघातग्रस्त प्रवाशांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ही बस साहिबगंजहून दुमकाकडे जात होती. पाकूरचे एसपी एचपी जनार्दन यांनी सांगितले की, आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमधील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. बसमधून बरेच लोक रस्त्यावर पडले किंवा जखमी झाले, तर बरेच लोक आत अडकले. जखमी आणि मृतांना बसमधून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

Comments
Add Comment

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक

जम्मू काश्मीर : बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व विमानसेवा रद्द

श्रीनगर विमानतळावरील येणारी - जाणारी सर्व उड्डाणे सततच्या बर्फवृष्टीमुळे आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात