नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोरोना आणि ओमायक्रॉन रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीमध्ये विकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत राजधानीत ४००० हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या आठवड्यापासून वीकेंड कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. दिल्लीत शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू लागू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यानंतर दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची महत्त्वाची बैठकही पार पडली. त्यात वेगाने वाढणारी कोरोनाची रूग्णसंख्या लक्षात घेता कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याता आला. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच यातून सूट दिली जाणार आहे. तर, खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीदेखील कार्यालयातील संख्या ५० टक्क्यांवर आणण्यात येणार आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…