देशात कोरोनाची तिसरी लाट

  82

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट आली असून महानगरांमधील एकूण कोरोना प्रकरणांपैकी ७५ टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आढळून येत आहेत. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली आहे. भारतात स्पष्टपणे कोरोनाची तिसरी लाट आली आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सिन लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असेही कोविड टास्क फोर्सचे प्रमुख अरोरा यांनी सांगितले.


नोव्हेंबर महिन्यात सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर वेगाने संसर्ग होणाऱ्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमधील ७५ टक्के रुग्ण मुंबई, दिल्ली आणि कोलकाता अशा मोठ्या शहरांमधील असल्याचं डॉक्टर एन के अरोरा यांनी सांगितले.


भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यापैकी बहुतेक रुग्ण हे मोठ्या शहरांमधून येत आहेत. कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचे हे संकेत आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्ण आढळले आहेत, असे देशाच्या लस वॅक्सिन टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितले. देशात कोविड लसीकरण सुरू झाल्यापासून एन. के. अरोरा या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत.


"ज्या वेरियंटची जिनोम सिक्वेन्सिंग केली गेली, त्यानुसार, गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्तरावरील सर्व वेरियंटपैकी १२ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत. पण गेल्या आठवडाभरात हे प्रमाण २८ टक्क्यांवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत कोविड संसर्गाच्या इतर वेरियंटपेक्षा ओमायक्रॉनचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे रुग्ण आढळून येत आहेत आहे. महानगरांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत आहे. या महानगरांमध्ये ओमायक्रॉनची ७५ टक्के रुग्ण आहेत, असे नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे (NTAGI) प्रमुख डॉ. अरोरा म्हणाले.


भारतात ओमायक्रॉनच्या १७०० रुग्णांची अधिकृतपणे नोंद झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ५१० रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात स्पष्टपणे कोरोनाची तिसरी लाट आली आहे आणि संपूर्ण परिस्थिती पाहता, नवीन वेरियंटचे अधिक रुग्ण आहेत. ते ओमायक्रॉनचे आहेत. गेल्या ४-५ दिवसांत सापडलेले पुरावे देखील याकडे निर्देश करतत आहेत आणि कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढत होत आहे, असे अरोरा म्हणाले. डॉक्टर अरोरा राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे चेअरमनदेखील आहेत.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )