शाळेतील सूर्य नमस्काराच्या विरोधात फतवा जारी

Share

नवी दिल्ली : लहान मुलांच्या आरोग्यासाठी शाळेत होणाऱ्या सूर्य नमस्काराला मुस्लिमांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सूर्य नमस्काराच्या विरोधात फतवा जारी करत मुस्लीम विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी म्हटले आहे की, भारत एक धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतीक देश आहे. याच सिद्धांताच्या आधारावर आपले संविधान लिहिण्यात आले आहे. शाळांचे अभ्यासक्रम आणि शैक्षणिक चर्चांमध्ये देखील याचे भान ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

संविधान आपल्याला याची परवानगी देत नाही की, सरकारी शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही धर्माची शिकवण दिली जावी किंवा विशेष समूहाच्या मान्यतेच्या आधारे समारंभांचे आयोजन केले जावे हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण सध्या सरकार संविधानाच्या या नियमापासून दूर चालली आहे. तसेच देशातील सर्व वर्गातील बहुसंख्याकांचा धार्मिक विचार आणि परंपरा थोपण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे यावरुन दिसून येतेय की, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 30 राज्यांमध्ये सूर्य नमस्कार अभियान राबवण्याची योजना आखली आहे. यामध्ये 30 हजार शाळांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात येणार आहे. 1 जानेवारी ते 7 जानेवारी 2022 या काळात हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 26 जानेवारी रोजी सूर्य नमस्कारावर एक सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पण हे असंविधानिक कृत्य असून देशप्रेमाचा खोटा प्रचार आहे. कारण सूर्य नमस्कार हा सूर्याच्या पूजेचा एक भाग आहे. पण इस्लाम आणि देशातील इतर अल्पसंख्यांक सूर्याला देव मानत नाहीत आणि त्याची उपासनाही करत नाहीत. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा आणि धर्मनिरपेक्ष मुल्यांचे पालन करावे, असे या फतव्यात नमूद करण्यात आले आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

24 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

44 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago