वाड्यामध्ये लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  128



वाडा  :राज्य सरकारने आजपासून १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींच्या लसीकरणाला सुरुवात केली असून आज चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात विशेष कार्यक्रमाने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.



कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान पगारे यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व सांगून अफवांवर विश्वास न ठेवता १५ ते १८ वयोगटातील सर्वांनी कोविड लस घेण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, पंचायत समिती सदस्य राजेश सातवी, कुडूस विभाग शिक्षण सेवा संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील, डॉ. निकिता पाटील आदी उपस्थित होते.



दरम्यान तालुक्यात किशोरवयीन मुले-मुली दहा हजारांच्या आसपास असून येत्या पंधरा दिवसांत सर्वांचे लसीकरण केले जाईल. आज सोमवारी चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात ३००, वाडा शहरातील पी. जे. विद्यालयात ३००, तर कंचाड येथील सरस्वती विद्यालयात ३०० मुला-मुलींचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली.

Comments
Add Comment

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards : “आईच्या साडीचा अभिमान… पुरस्कार स्विकारताना काजोल भावूक”, काजोलचं मराठी भाषण ठरलं खास आकर्षण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात

दूध भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दूध स्कॅनर

मुंबई (वार्ताहर) : दूध भेसळीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे रोखण्यासाठी