नितेश राणेंची रणनीती यशस्वी

मुंबई : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा राणेंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. आमदार नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि पुन्हा एकदा सहकार क्षेत्रावर राणेंनी झेंडा रोवला.



२००९ आणि २०१५ ला जिल्हा बँक राणेंच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. मागील १५ वर्षांत राणेंच्या नेतृत्वात बँकेची झालेली प्रगती, उत्तम कारभार करून सभासदांचा, शेतकऱ्यांचा राणे यांनी विश्वास जिंकला होता. यामुळेच तीन पक्षांच्या आघाडीवर मात करण्यात राणे यशस्वी झाले.


मागील दोन वर्षांपासून या बँकेच्या निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्ष करत होता. विशेष करून आमदार नितेश राणे हे सतीश सावंत यांना बँकेतून हद्दपार करायचे या निर्धाराने मैदानात उतरले होते. गेल्या वर्षभरात त्यांनी लावलेली फिल्डिंग अधिक मजबूत केली. प्रत्येक मतावर लक्ष केंद्रित केले. मतांची जुळवाजुळव केली. नितेश राणे यांची रणनीती पाहून विरोधक देखील हादरले. सतीश सावंत यांनी थेट सर्वपक्षीय पॅनल बिनविरोध करूया असा प्रस्ताव ठेवला. पण स्वतःच्या ताकदीवर विश्वास असलेल्या आमदार नितेश राणे यांनी हा प्रस्ताव धुडकावून थेट मैदानात उतरले.


निवडणुकीच्या रणांगणात तीन पक्षांच्या आघाडीला नामोहरम केले. शेवटी नितेश राणेंना रोखण्यासाठी कटकारस्थान रचून अडकवण्यात आले. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंनी बँकेची तटबंदी अभेद्य केली होती. अखेरच्या १० दिवसांत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निर्णायक भूमिका बजावली. माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, दत्ता सामंत यांनी जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून यंत्रणा हाताळली. यामुळेच निकालाच्या दिवशी विरोधकांना धूळ चारून जिल्हा बँकेवर भाजपच्या विजयाचा वारू उधळला गेला.

Comments
Add Comment

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये

वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी

Ameet Satam: मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी फुंकला शंख मुंबई (विशेष प्रतिनिधी) "४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात होणार पाणी कपात

मुंबई: मुंबईकरांसाठी फार महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पाणी

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६