नितेश राणेंची रणनीती यशस्वी

मुंबई : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा राणेंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. आमदार नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि पुन्हा एकदा सहकार क्षेत्रावर राणेंनी झेंडा रोवला.



२००९ आणि २०१५ ला जिल्हा बँक राणेंच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. मागील १५ वर्षांत राणेंच्या नेतृत्वात बँकेची झालेली प्रगती, उत्तम कारभार करून सभासदांचा, शेतकऱ्यांचा राणे यांनी विश्वास जिंकला होता. यामुळेच तीन पक्षांच्या आघाडीवर मात करण्यात राणे यशस्वी झाले.


मागील दोन वर्षांपासून या बँकेच्या निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्ष करत होता. विशेष करून आमदार नितेश राणे हे सतीश सावंत यांना बँकेतून हद्दपार करायचे या निर्धाराने मैदानात उतरले होते. गेल्या वर्षभरात त्यांनी लावलेली फिल्डिंग अधिक मजबूत केली. प्रत्येक मतावर लक्ष केंद्रित केले. मतांची जुळवाजुळव केली. नितेश राणे यांची रणनीती पाहून विरोधक देखील हादरले. सतीश सावंत यांनी थेट सर्वपक्षीय पॅनल बिनविरोध करूया असा प्रस्ताव ठेवला. पण स्वतःच्या ताकदीवर विश्वास असलेल्या आमदार नितेश राणे यांनी हा प्रस्ताव धुडकावून थेट मैदानात उतरले.


निवडणुकीच्या रणांगणात तीन पक्षांच्या आघाडीला नामोहरम केले. शेवटी नितेश राणेंना रोखण्यासाठी कटकारस्थान रचून अडकवण्यात आले. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंनी बँकेची तटबंदी अभेद्य केली होती. अखेरच्या १० दिवसांत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निर्णायक भूमिका बजावली. माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, दत्ता सामंत यांनी जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून यंत्रणा हाताळली. यामुळेच निकालाच्या दिवशी विरोधकांना धूळ चारून जिल्हा बँकेवर भाजपच्या विजयाचा वारू उधळला गेला.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या