नितेश राणेंची रणनीती यशस्वी

Share

मुंबई : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा राणेंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. आमदार नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि पुन्हा एकदा सहकार क्षेत्रावर राणेंनी झेंडा रोवला.

२००९ आणि २०१५ ला जिल्हा बँक राणेंच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. मागील १५ वर्षांत राणेंच्या नेतृत्वात बँकेची झालेली प्रगती, उत्तम कारभार करून सभासदांचा, शेतकऱ्यांचा राणे यांनी विश्वास जिंकला होता. यामुळेच तीन पक्षांच्या आघाडीवर मात करण्यात राणे यशस्वी झाले.

मागील दोन वर्षांपासून या बँकेच्या निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्ष करत होता. विशेष करून आमदार नितेश राणे हे सतीश सावंत यांना बँकेतून हद्दपार करायचे या निर्धाराने मैदानात उतरले होते. गेल्या वर्षभरात त्यांनी लावलेली फिल्डिंग अधिक मजबूत केली. प्रत्येक मतावर लक्ष केंद्रित केले. मतांची जुळवाजुळव केली. नितेश राणे यांची रणनीती पाहून विरोधक देखील हादरले. सतीश सावंत यांनी थेट सर्वपक्षीय पॅनल बिनविरोध करूया असा प्रस्ताव ठेवला. पण स्वतःच्या ताकदीवर विश्वास असलेल्या आमदार नितेश राणे यांनी हा प्रस्ताव धुडकावून थेट मैदानात उतरले.

निवडणुकीच्या रणांगणात तीन पक्षांच्या आघाडीला नामोहरम केले. शेवटी नितेश राणेंना रोखण्यासाठी कटकारस्थान रचून अडकवण्यात आले. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंनी बँकेची तटबंदी अभेद्य केली होती. अखेरच्या १० दिवसांत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निर्णायक भूमिका बजावली. माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, दत्ता सामंत यांनी जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून यंत्रणा हाताळली. यामुळेच निकालाच्या दिवशी विरोधकांना धूळ चारून जिल्हा बँकेवर भाजपच्या विजयाचा वारू उधळला गेला.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

6 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

38 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

10 hours ago