मुंबईत दिवसभरात ८,०८२ नवे बाधित

मुंबई  : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून आज दिवसभरात ८,०८२ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८०,७६,०२ वर पोहोचली आहे.


सोमवारी २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १६,३७९ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात ६२२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ७,५१,३५८ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. दरम्यान,


सोमवारी आढळलेल्या रुग्णांपैकी ५७४ कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ५७४ पैकी ७१ रुग्णांना ऑक्सिजन बेड्सवर ठेवण्यात आले आहे, तर सील बंद इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सील बंद इमारतींची संख्या ३१८ झाली आहे.


 


माहीममध्ये १३०, धारावीत ४१ तर दादरमध्ये ९१ रुग्ण


 


मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून तिसऱ्या लाटेत धारावी, दादर, माहीममध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेतही धारावी, दादर, माहीममध्ये रुग्णसंख्या वाढली होती. सोमवारी दिवसभरात माहीममध्ये सर्वाधिक म्हणजे १३० तर दादरमध्ये ९१ आणि धारावीमध्ये ४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र एवढी मोठी रुग्णसंख्या आढळल्याने पुन्हा एकदा पालिका आरोग्य विभाग चिंतेत पडला आहे. गेल्या लाटेमध्ये धारावीत कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या नाकीनऊ आले होते.


 


अभिनेता जॉन अब्राहमनंतर एकता कपूरलाही लागण


 


अभिनेता जॉन अब्राहमपाठोपाठ आता एकता कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. सर्व काळजी घेतल्यानंतरही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्बेत ठिक आहे आणि माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी या आशायची पोस्ट शेअर केली आहे. तसेच एकता कपूरने स्वत:ला क्वारंटाइन केले आहे


 





Comments
Add Comment

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या