मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात जास्त नागरिक हे विना मास्क फिरताना दिसतात. तसेच काही फेरीवाले व भाजीविक्रेते, दुकानदार, व्यवसायिक देखील मास्कचा वापर न करताना आढळून येतात. अशा व्यक्तींवर व फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.
त्याचबरोबर अशा बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिका व पोलीस प्रशासन एकत्र मिळून कारवाई करणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले आहे.


मागील काही दिवसांत राज्यात तसेच मीरा-भाईंदर शहरात कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका सज्ज झाली असून त्या आनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांनी ०१ जानेवारी रोजी आपत्कालीन बैठक आयोजित केली होती.
प्रभाग क्रमांक २ च्या अंतर्गत रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या, दुकानात गर्दी जमा करून मास्कचा वापर न करणाऱ्या,भाजीविक्री करताना मास्क न वापरणाऱ्या सर्व बेजबाबदार दुकानदार, नागरिक यांच्याकडून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला आहे.


मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून प्रभाग २ अंतर्गत एकूण ११ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती प्रभाग अधिकारी प्रियंका भोसले यांनी दिली आहे. सर्वांनी मास्कचा वापर करा व कोविड नियमांचे पालन करावे, असे देखील भोसले यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या