मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात जास्त नागरिक हे विना मास्क फिरताना दिसतात. तसेच काही फेरीवाले व भाजीविक्रेते, दुकानदार, व्यवसायिक देखील मास्कचा वापर न करताना आढळून येतात. अशा व्यक्तींवर व फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.
त्याचबरोबर अशा बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिका व पोलीस प्रशासन एकत्र मिळून कारवाई करणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले आहे.


मागील काही दिवसांत राज्यात तसेच मीरा-भाईंदर शहरात कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका सज्ज झाली असून त्या आनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांनी ०१ जानेवारी रोजी आपत्कालीन बैठक आयोजित केली होती.
प्रभाग क्रमांक २ च्या अंतर्गत रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या, दुकानात गर्दी जमा करून मास्कचा वापर न करणाऱ्या,भाजीविक्री करताना मास्क न वापरणाऱ्या सर्व बेजबाबदार दुकानदार, नागरिक यांच्याकडून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला आहे.


मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून प्रभाग २ अंतर्गत एकूण ११ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती प्रभाग अधिकारी प्रियंका भोसले यांनी दिली आहे. सर्वांनी मास्कचा वापर करा व कोविड नियमांचे पालन करावे, असे देखील भोसले यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक