मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

  83

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात जास्त नागरिक हे विना मास्क फिरताना दिसतात. तसेच काही फेरीवाले व भाजीविक्रेते, दुकानदार, व्यवसायिक देखील मास्कचा वापर न करताना आढळून येतात. अशा व्यक्तींवर व फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.
त्याचबरोबर अशा बेजबाबदार नागरिकांवर महानगरपालिका व पोलीस प्रशासन एकत्र मिळून कारवाई करणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले आहे.


मागील काही दिवसांत राज्यात तसेच मीरा-भाईंदर शहरात कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका सज्ज झाली असून त्या आनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांनी ०१ जानेवारी रोजी आपत्कालीन बैठक आयोजित केली होती.
प्रभाग क्रमांक २ च्या अंतर्गत रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या, दुकानात गर्दी जमा करून मास्कचा वापर न करणाऱ्या,भाजीविक्री करताना मास्क न वापरणाऱ्या सर्व बेजबाबदार दुकानदार, नागरिक यांच्याकडून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला आहे.


मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून प्रभाग २ अंतर्गत एकूण ११ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती प्रभाग अधिकारी प्रियंका भोसले यांनी दिली आहे. सर्वांनी मास्कचा वापर करा व कोविड नियमांचे पालन करावे, असे देखील भोसले यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत